कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसाने हैराण केले आहे. यातच आजपासून (ता. 18) पासून दोन दिवस मूसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पंचगंगा, वारणा, दूधगंगा व घटप्रभा खोऱ्यातील नद्यांची पूर परिस्थिती कायम राहणार आहे. पंचगंगा नदीने सोमवारी इशारा पातळी गाठली. रात्री साडेअकराच्या दरम्यान पाणी पातळी 39.2 फूट इतकी होती.
दरम्यान, प्रयाग चिखली, वडणगे, वरणगे-पाडळी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु झाले आहे. आज एनडीआरएफच्या पथकाने या गावातील रहिवासियांना सोनतळी येथे स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले. प्रयाग चिखली, वरणगे-पाडळी गावातील 30 टक्के लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चार गावांमधील 1709 व्यक्तींचे व 365 जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. चिखलीतील 895 व्यक्ती व 237 जनावरे, आंबेवाडीतील 615 व्यक्ती व 112, चंदगडमधील एक गावातील 45 कुटुंबातील 184 व्यक्तींसह 16 जनावरे, महापालिका क्षेत्रातील आठ कुटूंबातील 15 नागरिकांचे स्थलांतरीत केले आहे. शहरातील एका संक्रमण शिबिरात 5 पुरुष, 9 महिला तर 1 लहान मुलगा आहे.
95 बंधारे पाण्याखाली
संपादन ः विजय वेदपाठक
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.