कोल्हापूर

इको सेन्सटिव्हमधील गावांना हवे शाश्‍वत विकासाचे धोरण 

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : इको-सेन्सिटिव्ह झोन झाला तर उद्योग येणार नाहीत. शेती करण्यासाठी अनेक अडचणी येतील, "विकास' थांबेल आणि रोजगारासाठी तरुणांना शहराकडे जावे लागेल, असे काही गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात काही बंधने सोडली तर इको-सेन्सिटिव्ह झोनमधील गावांना शाश्‍वत विकासाची संधी प्राप्त होणार आहे. मात्र, त्यासाठी शासनाने तशी धोरणे आखणे गरजेचे आहे. इको-सेन्सिटिव्ह झोनमुळे पश्‍चिम घाटातील जैवविविधता तर टिकेलच; पण या प्रदेशातील वैविध्यपूर्ण जीवनशैलीचेही जतन होणार आहे. 

"सेव्ह वेस्टर्न घाट मूव्हमेंट'ला 1987 ला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यातून यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. जय सामंत, डॉ. अनुराधा सामंत, ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, संजय करकरे, सुनील करकरे यांचा सहभाग होता. त्यानंतर प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांनी न्यायालयीन लढाई देऊन अवैध खाणकाम बंद करायला शासनाला भाग पाडले, तेव्हापासून पश्‍चिम घाट संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत. इको-सेन्सिटिव्ह झोन या प्रयत्नाचा भाग आहे. मात्र, राज्य सरकारला पश्‍चिम घाटातील काही संवेदनशील ठिकाणी पुन्हा खाणकाम व अन्य उद्योग सुरू करायचे आहेत. त्यामुळे सरकारने 388 गावे वगळावीत, असा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. पक्ष कुठलाही असला तरी इको-सेन्सिटिव्ह झोनबद्दल सर्व पक्षांची भूमिका फारशी गांभीर्याची नाही. कारण सरकारच्या लेखी विकास म्हणजे मोठ्या इमारती आणि प्रदूषणकारी उद्योग हेच आहे.

याबाबतीत कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू सरकारचे धोरण अधिक पर्यावरणपूरक आहे. त्यांनी पश्‍चिम घाटातील डोंगराळ भागात  उसासारखी जास्त पाण्याची पिके न घेता मसाला पदार्थांची पिके घेतली आहेत. काही बंधने घालून पर्यटन व्यवसायही सुरू ठेवला आहे.  या भागात विविध हस्तकला, कुटीर उद्योग, मधुमक्षिका पालन यासारखे उद्योग सुरू केले आहेत. कर्नाटक सरकारने यासाठी स्वतंत्र जैवविविधता बोर्ड बनवला आहे.

महाराष्ट्रात मात्र इको-सेन्सिटिव्ह झोनबद्दल लोकप्रतिनिधींनी नकारात्मक भूमिका घेतल्याचे जाणवते. कोरोनाच्या संकटात शहरी विकासाच्या मर्यादा पुन्हा अधोरेखित झाल्या. अशावेळी स्थानिक संसाधनांचा मर्यादित उपयोग करून विकासाची नवी वाट शोधण्याची आवश्‍यकता आहे. 
 

इको-सेन्सिटिव्ह झोनकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. या झोनमुळे जैवविविधतेचे संरक्षण होईलच; पण पश्‍चिम घाटातील दुर्गम भागातील गावांनाही विकासाची समान संसाधने उपलब्ध होतील. तेथील शेती, खाद्यसंस्कृतीचे अस्तित्व टिकून राहील. 
- प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT