warning of maratha kranti morcha to maharashtra government 
कोल्हापूर

...अन्यथा आंदोलन ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या सरकारने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा ९ ऑगस्टला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयकांच्या ऑनलाईन बैठकीत दिला आहे.

बैठकीत मराठा क्रांती मोर्चाच्या  प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली. मराठा समाजाने आजवर अनेक आंदोलने केली, मराठ्यांने काढलेले ५७ मूक क्रांती मोर्चे शांततापूर्वक झालेल्या आंदोलनाचे उत्तम उदाहरण आहे. याचबरोबर मेडिकलच्या पीजी विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन करून त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या. कोरोना सुरू व्हायच्या आधी ESBC २०१४ चे उमेदवारसुद्धा अशाच प्रकारे शांततेत आंदोलन करत होते. आंदोलने म्हणजे  हातात दगड घेणे नाही, मराठा समाज तर याचे समर्थन कधीच करत नाही. देशात अनेक राज्यांनी हिंसक आंदोलने बघितली; पण कायद्याच्या कसोटीत उतरल्याशिवाय आरक्षण भेटत नाही, हे मराठ्यांनी दाखवून दिले आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.

मराठा समाजाच्या तरुणांना खोट्या गुन्ह्यांत अडविले होते; परंतु ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अजून प्रलंबित आहे. येत्या ७ जुलैला मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू होणार आहे. पण, सरकार दरबारी मात्र त्याबद्दल अजून अनास्थाच आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र दिल्यानंतर घाईत उपसमितीची बैठक घेतली. त्यावर अजून ठोस काम नाही. सारथी, अण्णासाहेब   महामंडळ यांची अवस्था तशीच आहे. या परिस्थितीत हाताची घडी घालून बघणारा मराठा समाज नाही.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियापासून आंदोलनापर्यंत... जेन-झी 'Vasteguna Huiya'च का म्हणतायत? हा ट्रेंड नेमका सुरू कसा झाला? वाचा Inside Story...

Mumbai News: आता मुंबईकरांना नो टेन्शन! १० टक्के पाणीकपातीचं संकट दूर होणार, कधीपासून? तारीख आली समोर

Raigad Flood: भेरव अंबा नदीचा पूल पाण्याखाली; रायगडमधील आदिवासी गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

Yoga Benefits: योगामुळे तंबाखू सोडण्याची शक्यता ५० टक्क्यांनी वाढली; एम्सच्या संशोधनातून मोठा खुलासा!

MPSC Paper Leak: 'तो' पेपर फुटलाच नव्हता? तक्रारच बनावट? तक्रारदाराने 'ई-मेल'मध्ये काय म्हटलंय?

SCROLL FOR NEXT