A wave of fake stock market companies in Kolhapur; The lure of 12 to 15 percent interest per month 
कोल्हापूर

कोल्हापुरात बनावट शेअर मार्केट कंपन्यांचे पेव ;  महिन्याला 12 ते 15 टक्के व्याजाचे आमिष 

निवास चौगले

कोल्हापूर : महिन्याला बारा-पंधरा टक्के व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून गुंतवणूक करून घेणाऱ्या बनावट शेअर मार्केट कंपन्यांचे पेव कोल्हापुरात फुटले आहे. पहिल्यांदा गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराला दुसऱ्याने केलेल्या गुंतवणुकीतील पैसे परत देण्याचा हा प्रकार म्हणजे "एकाची टोपी दुसऱ्याच्या डोक्‍यावर' घालण्यासारखा आहे. त्यातून मोठी फसवणूक होण्याची शक्‍यता आहे. 

अशाच पद्धतीने शेअर मार्केटमधील कंपनीकडून झालेल्या फसवणूक प्रकरणी कालच (ता. 25) कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर या कंपन्यांचा आढावा घेतला असता कोल्हापुरात अशा कंपन्यांचे पेवच फुटल्याचे समोर आले आहे. 
पहिल्या शंभर लोकांना गुंतवणुकीचे पैसे परत देऊन इतरांचा विश्‍वास मिळवण्याच्या या प्रयत्नात शेवटच्या टप्प्यात गुंतवणूक केलेल्या व्यक्तीची फसवणूक या व्यवहारात नक्की आहे. या कंपन्यांवर वेळीच कारवाईची गरज आहे.

कोल्हापुरात 2001 ते 2003 या काळात अशी एखादी कंपनीच होती, त्या कंपनीनेही अशीच फसवणूक केली. या कंपन्यांचे मुख्यालय मुंबईत, त्याचा मालक अन्य राज्यांत आणि कंपनीसाठी पैसे गुंतवणूक करायला लावणारे एजंट स्थानिक असतात. 2003 साली अशीच गुंतवणूक करून घेतलेल्या एका एजंटाने आत्महत्या केली, तत्पूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत गुंतवणूकदारांची नावे लिहिली, त्यामुळे पैसेही गेले आणि उलट पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. अशीच परिस्थिती आता सुरू आहे. 

या कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी कमिशनवर एजंट नेमले आहेत. गुंतवणुकीच्या 15 ते 20 टक्के कमिशन या एजंटांना दिले जाते. गुंतवणूकदाराला महिन्याला 12 ते 15 टक्के परताव्याचे आमिष दिले जाते. त्यातून सुरुवातीला गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे आणि परतावाही चांगला मिळतो; पण गुंतवणूकदारांची संख्या जशी वाढेल, त्यानंतर मात्र शेवटी गुंतवणूक करणाऱ्याला पैसेच मिळत नाहीत. काल गुन्हा दाखल झालेले प्रकरण हे याच स्वरूपाचे आहे. युरोप, अमेरिकेत गुंतवणूक केलेल्या पैशावरच संबंधिताला परतावा देण्याचा कायदा आहे, तो भारतात नसल्याने या कंपन्या मनमानी करत लोकांची लुबाडणूक करत आहेत. 

कोल्हापुरात पाच कंपन्या 
पूर्वी अशा प्रकारची एकच कंपनी कोल्हापुरात होती, आता शाहूपुरी, पितळी गणपती परिसर आणि इतरत्र, अशा पाच कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यात स्थानिक तरुणच एजंट, कंपनीचे फ्रॅंचाईजी म्हणून काम करत आहेत. आपल्या ओळखीच्या लोकांना या तरुणांकडून गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केले जाते. 


जेवढा परतावा जास्त, तेवढा धोका अधिक, हे गुंतवणूक क्षेत्राचे ब्रीदवाक्‍य आहे. कोणत्याही गुंतवणुकीचा परतावा हा खात्रीशीर नसतो. अशा परिस्थितीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून केलेल्या गुंतवणुकीत फसवणुकीची शक्‍यता असते. त्यातही गुंतवणूकदार अशा कंपन्यांना प्रश्‍न विचारत नाही, हे प्रश्‍न विचारले पाहिजेत. 
- रवींद्र पाटील, शेअर मार्केट तज्ज्ञ. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT