What kind of lockdown and what ...? 
कोल्हापूर

कसले लॉकडाऊन आणि काय...? 

सदानंद पाटील

कोल्हापूर : कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. तसेच जिल्हा बंदीही करण्यात आली आहे. तरीही परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांचा ओघ थांबेना. मागील चार दिवसात 435 लोकांचा जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. यातील बहुतांश लोक हे पुणे, मुंबई, बेळगाव, सांगली, सातारा जिल्ह्यातून आले आहेत.

ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे, अशाच जिल्ह्यातून लोक येत असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची भिती व्यक्‍त होत आहे. महत्वाचे म्हणजे परजिल्ह्यातून येणारे बहुतांश लोक हे आडमार्गाचा किंवा गाडीतूनच लपून-छपून येत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउन जाहीर केले. लॉकडाउनचा पहिला टप्पा संपण्यापुर्वीच दुसरा टप्पा सुरु झाला आहे. अजूनही लॉकडाऊन वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतला. तर जिल्ह्यांतर्गत देखील केवळ जीवनावश्‍यक सेवा या बंदीतून वगळण्यात आल्या आहेत. एकाबाजुला प्रशासन कडक धोरण अवलंब करत असले, तरी दुसऱ्या बाजुला जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय दिसत आहे. 

मागील चार दिवसात सुमारे 435 लोकांनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. सरासरी दररोज 100 लोक जिल्ह्यात प्रवेश करत असतील तर हे कसले लॉकडाऊन ?, अशीच चर्चा आता होवू लागली आहे. मागील चार दिवसात मुंबईतून 25, पुणे येथून 50, बेळगाव येथून 12 तसेच सांगली, सातारा जिल्ह्यातूनही लोक कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दाखल झाले आहेत. लॉकडाऊनच्या सुरुवातीला ज्या पद्धतीने अत्यंत कडकपध्दतीने त्याची अंमलबजावणी झाली तशी आता होताना दिसत नाही. तसेच बाहेरील जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा देखील अत्यावश्‍यक सेवेचे पास देत असल्यानेही जिल्ह्यात येणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. 


जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी विविध युक्‍त्यांचा वापर होत आहे. अत्यावश्‍यक सेवेसाठी जसे भाजीपाला, औषधे, शेतीमाल, वैद्यकीय सेवांच्या नावाखाली येणाऱ्या वाहनांतूनही लोक ग्रामीण भागात येत असल्याची चर्चा आहे. या सर्वात अडवाटांचा मोठा वापर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जिल्ह्यात येत असलेले लोक हे बहुतांश कोरोनाग्रस्त भागातून येत आहेत. चार दिवसांत 435 लोकांचा झालेला प्रवेश हा मोठा आकडा आहे. अशा सर्व लोकांचे स्वॅब घेवून त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करणे आवश्‍यक आहे. मात्र, हे सर्व करताना आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना प्रतिबंध करणे अत्यावश्‍यक बनले आहे. 
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th Test: शुभमन गिलची पाचव्या सामन्यातून माघार; Sanju Samson ला आता तरी मिळेल जागा, की गौतम गंभीर करेल प्रयोग?

Child Rappelling Kokankada : शिवरायांची वाघीण! कोकणकड्यावरून चिमुकलीचं थरारक रॅपलिंग; महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची आद्याश्री तरी कोण?

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्ब धमकी; बॉम्बशोध पथक व डॉग स्कॉडकडून कसून तपास

Kolhapur Municipal : गुन्हेगारीचा थेट प्रवेश; महापालिका निवडणुकीत गुंड-मटकेवाल्यांची बायकांसाठी उमेदवारीची धडपड

Mutual Fund Rule: मोठी बातमी! म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्ससाठी नियम बदलले, सेबीचा ऐतिहासिक बदल

SCROLL FOR NEXT