lockdown impact working for people at belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

गावी आल्याचे समाधान पण पुढे काय...?

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे आपल्या गावी परतल्याचे समाधान मिळालेल्या हजारो कामगारांना आपल्या भविष्याची चिंता लागुन राहिली आहे. तसेच परिस्थिती लवकर पुर्वपदावर आली नाही तर पुढे काय असा प्रश्‍न बेळगाव, खानापूर आदी भागातील कामगारांना पडला आहे. सध्या पुणे, मुंबई व इतर भागातुन आलेले नागरीक शेती कामात आपल्या कुटुंबाला हातभार लावीत आहे. परंतु कोरोनाचे संकट असेच राहिले तर येणारा काळ कामगारांसाठी अवघड ठरणार आहे. 


बेळगाव, खानापूर, हल्याळ आदी भागातील अनेक युवक मोठ्‌या संख्येने पुण्याला नोकरीला आहे. तर काहीजण व्यवसाय व इतर कामांसाठी पुण्याला असतात. यापैकी अनेक कामगार लॉकडाऊन जाहीर होण्यापुर्वी आपल्या गावी परत आले आहेत. तर काही कामगार लॉकडाऊन शिथील केल्यानंतर आपल्या गावी परतत आहेत. मात्र पुणे आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रात अधिक प्रमाणात सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांची चिंता वाढत असुन सर्व व्यवहार सुरळीत झाले तरी येणाऱ्या काळात परत जाण्याची लवकर परवानगी मिळणार का याबाबतही कामगारांमध्ये सांक्षकता असुन गावी येऊन पोहचल्याचे समाधान असले तरी येणारा काळ पुणे, मुंबई व इतर ठिकाणी कामास असलेल्या कामगारांना त्रासदायक ठरणार आहे.

पुणे व इतर भागातुन आलेल्या कामगारांसमोर प्रश्‍न 
लॉकडाऊनमुळे आपल्या गावी परतलेल्या अनेक कामगारांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असुन दररोज कामाची सवय असलेल्या कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. अनेकजण पुणे व इतर भागात वास्तव्यास आहेत त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍नही अनेक कामगारांसमोर उभा ठाकला आहे त्यामुळे कोरोनाचे संकट लवकर दुर व्हावे अशीच अपेक्षा प्रत्येक कामगार करु लागला आहे. 

हेही वाचा- जीव पडला भांड्यात ; गोवा सरकारने त्याला काल पॉझीटीव्ह घोषीत  केले अन् आज तो झाला निगेटीव्ह....

मार्च महिन्याच्या अखेरीस पुण्यावरुन गावाकडे आलो आहे. तेंव्हापासुन वडीलांना शेती कामात मदत करीत आहे. मात्र कोरोनाचे संकट लवकर दुर होणे आवश्‍यक आहे. अन्यथा सर्वांनाच मोठा फटका बसणार आहे. गावाकडे परतलेल्या कामगारांसाठी सरकारने मदतीचा हात पुढे करणे आवश्‍क आहे. 
सुनिल गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT