पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : विकासकामांची शिदोरीवरच अन् जनतेच्या विश्‍वासावरच विजयी होईन

सकाळवृत्तसेवा

खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह मित्रपक्षांची साथही मिळाली. खासदार म्हणून निवडून दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खासदारांची कामे समजावून घेण्यापासून पूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच लोकसभेत प्रश्‍न मांडायचे कोल्हापूरकरांची मान देशभरात उंचावेल, अशा पद्धतीने काम केले. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे प्रकल्प मार्गी लागला.

कोल्हापूरच्या विमानसेवेचा उडानमध्ये समावेश करून घेतल्याने विमानसेवा सुरू झाली. शहराच्या प्रवेशद्वारावर बास्केट ब्रीजसाठी निधी मंजूर झाला, आता पुढील कार्यवाही होईल. इएसआय रुग्णालय, पासपोर्ट कार्यालय, बीएसएनल टॉवर उभारणे, शिवाजी पुलाचा कायदा बदलण्याचा प्रश्‍न, खेलो इंडियामधील प्रश्‍न असे विविध प्रश्‍न उपस्थित करून त्यांची सोडवणूक करून विकासाची नवे दारे खुली केली. सॅनिटरी नॅपकीन, रेल्वेतील महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही, शैक्षणिक कायद्यातील बदल असे देशपातळीवर निर्णय बदलण्यासाठी सरकारला भाग पाडले. परदेशातील अनेक देशांच्या उच्चायुक्तांबरोबर चर्चासत्रात सहभाग घेतला. परदेशातील अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला. कोल्हापूरकरांचा एक प्रतिनिधी म्हणूनच सर्वोत्कृष्ट कामगिरी दाखवण्यात यश आले.’’

मला निवडून आणण्यासाठी सर्वच घटक पक्षातील लोकांची मदत लाभल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘मी पक्षविरोधी भूमिका किंवा काम केल्याचा गैरसमज विरोधकांकडून पसरवला जात आहे. माझ्यासाठी ज्यांनी काम केले तेच विविध निवडणुकीत विरोधात उभे ठाकले. अशा परिस्थितीत मी एकाची बाजू घेणे योग्य नव्हते म्हणूनच मी शांत बसलो. या सर्वांशी बोलून मी हा गैरसमज दूर केला आहे. पक्षविरोधी मी भूमिका घेतली असती, तर खासदार शरद पवार यांनी आपल्याला पुन्हा निवडणुकीसाठी तिकीट दिले असते का? खासदार श्री. पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्षभर एकत्रित येऊन केंद्रातील सरकारविरोधी मोट बांधली आहे. त्यांच्या प्रयत्नांतून महागंठबंधन तयार झाले. देशभर केंद्र सरकारविरोधी लाट आहे. परंतु, कोल्हापुरातील काही जणांनी खासदार श्री. पवार आणि श्री. गांधी यांचा संदेश ऐकला नाही. त्यांची भूमिका वेगळी आहे; परंतु काँग्रेस ताकदीने काम करत आहे.’’ 

हे करणार 

  •  तरुणांसाठी स्थानिक पातळीवर आयटी कंपन्यांसारख्या नोकरी  
  •  इंटरनॅशनल कन्व्हेशन सेंटर 
  •  क्रीडा क्षेत्रासाठी सुविधा 
  •  स्थानिक खेळाडूंकडे कौशल्य आहे, पण सुविधा नाहीत. त्यांना सुविधा   विमानतळाचा विकास 
  •  एम्सच्या धर्तीवर एखादे चांगले सरकारी रुग्णालय  
  •  काजू-चप्पल यासाठी क्‍लस्टर योजना
  •  पर्यटन विकास व रोजगारनिर्मितीसाठी 
  •  केंद्रीय विद्यालय
  •  रेल्वे स्थानकाचा विकास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT