पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त विकासाचा ट्रेलर - गडकरी

सकाळवृत्तसेवा

विटा - पाणी आले म्हणून साखरेचे उत्पादन न करता इथेनॉलचे उत्पादन घ्या, तरच पश्‍चिम महाराष्ट्र वाचेल. साखरेचे उत्पादन घेत बसला तर तुम्हाला वाचवण्याची ताकद सरकारमध्ये नाही. आणखी खड्ड्यात जाल,  असा इशारा केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज दिला. त्यांनी टेंभूचे पाणी, महामार्गांची कामे हा फक्त विकासाचा ट्रेलर आहे. परिवर्तनाची वाट सुरु झाली आहे असे टेंभूचे पाणी आणि रस्त्यांचा विकास "ये तो ट्रेलर है' असे सांगत विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना विजयी करा असे आवाहन केले. 

सांगली लोकसभा मतदार संघातील प्रचाराचा समारोप आज झाला. भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांची विट्यात प्रचार सांगता सभा महात्मा गांधी मैदानावर झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार संजय पाटील उपस्थित होते. 

मंत्री नितीन गडकरी म्हणाले,"" टेंभू योजनेचे पाणी आलेले पाहून आनंद वाटला. यामुळे पिकांना पाणी उपलब्ध असेल. पण पाणी आले म्हणून ऊस लावून साखरेचे उत्पादन घेऊ नका. ब्राझीलमध्ये साखरेचे भाव 20 रुपये असताना आम्ही 34 रुपये धरुन उसाला दर दिला आहे. पीक पध्दतीत लक्ष घातले नाही तर पुढच्या काळात आणखी फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. ऊसापासून मळीचे उत्पादन वाढवून इथेनॉलचे उत्पादन घ्या. जेवढे इथेनॉल कराल तेवढे सरकार विकत घेईल. साखरेचे उत्पादन वाढवून आपण खड्ड्यात जाऊ.'' 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्‌टी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले,"" प्रश्‍न समजून न घेता आंदोलन कराल तर साखर कारखाने बंद पडतील. मग शेतकरी कुणाला ऊस विकणार? कारखानदारांनी किती चुका केल्या, भ्रष्टाचार केला त्यावर कारवाई करायला हरकत नाही. पण, साखर कारखानदारी किफायतशीर नाही. कारखानदारांचे प्रश्‍न समजून घ्या. शेतकऱ्याचे कल्याण झाले पाहिजे, त्याला पैसे मिळाले पाहिजेत. पण, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी मारता कामा नये.'' 

ते म्हणाले,"" इथेनॉलची इकॉनॉमी मजबूत केली पाहिजे. बायोडिझेल, बायोप्लॅस्टीकचे उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांची गरिबी हटल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी समृध्द, संपन्न झाला पाहिजे. तरुणांना रोजगार मिळेल. हे करण्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदी सरकार योग्य आहे. त्यासाठी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. 

तेव्हा माझे वाक्‍य आठवेल 
श्री. गडकरी म्हणाले, मला माहिती आहे पाणी आले की ऊस लावाल. माझे ऐकणार नाही. पण साखर समुद्रात फेकावी लागेल इतके उत्पादन होईल. तेव्हा माझे वाक्‍य आठवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT