पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा ते निंबोणी रस्त्याची दुरावस्था

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - मंगळवेढा ते निंबोणी या कमी रूंदीच्या डांबरी रस्त्यावर खड्डे पडल्याने हेच खड्डे चुकविताना अवजड वाहनधारकाला कसरत करावी लागत आहे. ही कसरत वाहनाधारकाला नुकसानीची ठरत आहे. 

लवंगीच्या कारखान्याला ऊस गाळपासाठी जाणारी वाहने देखील याच मार्गावरून जात आहेत. परंतु, हा रस्ता कमी रुंदीचा असून, त्या रस्त्यावर पडलेले खड्डे चुकताना ऊस वाहतूक करणारी वाहने पलटी देखील झाली. यात सलगरच्या महिलेला जीव गमवावा लागला. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या मार्गावरील रस्त्याच्या खड्डे बाबत तक्रार करूनही गांभीर्याने घेतले नाही. एक डिसेंबरच्या भारत भालकेच्या गावभेट दौऱ्यात उपअभियंत्यानी या रस्त्यावर खड्डे तात्काळ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, याकडे त्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याने हे दुर्लक्ष एखाद्याच्या जीवितास धोका निर्माण करणारे ठरत आहे. 

सध्या रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या तालुक्यातील कामासाठी हिवरगाव येथून दगड ओव्हरलोड वाहतुक केल्यामुळे मध्य प्रदेशातील ठेकेदाराचे टिपर मंगळवेढा ते खोमनाळ रस्त्यावर ग्रामस्थानी रोखून धरण्यात आले होते.  

गेल्या महिन्यात याच महामार्गाच्या कामासाठी लेंडवेचिंचाळे येथील ग्रामस्थांनी खराब रस्ते होत असलेल्या कारणावरून टिपर रोखून धरले होते. त्यानंतर हे टिपर सोडून देण्यात आले. आता त्याच प्रकारे या मार्गावरून हिवरगाव येथून ओव्हरलोड दगड शहरालगत असलेल्या या ठेकेदाराच्या वाहनतळावर आणले जात आहे. टिपरमध्ये मोठ मोठे दगड वापरले जात आहेत. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चुकून जर असताना त्यातील दगड रस्त्यावर पडत असून हे पडणारे दुचाकी वाहन धारकांच्या जीवितास धोका निर्माण करणार असल्याच्या कारणावरून रोखून धरण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT