Many wanted to avoid rush in city... crease of foreign return also decreased
Many wanted to avoid rush in city... crease of foreign return also decreased 
पश्चिम महाराष्ट्र

शहरातली गर्दी नकोच... 'फॉरेन रिटर्न'चीही हवा गेली

सकाळवृत्तसेवा

लेंगरे : सध्या जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक जिल्हेदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. ग्रामीण भागातील युवक नोकरीनिमित्त नेहमी मुंबई, पुणे या शहरांकडे जातानाचे चित्र आतापर्यंत होते. रोजगारासाठी ग्रामीण भागातून जाऊन तिथेच संसार थाटत होते. मुलीकडून पसंतीही मुंबई, पुण्यातील मुलांना दिली जात असे. सध्या मात्र कोरोना या संसर्गजन्य रोगाची धास्ती असल्याने प्रत्येकाची पावले पुन्हा गावाकडे वळू लागली आहेत. 

चीनमधून सुरू झालेला कोरोनाच्या जीवघेण्या रोगाचा प्रसार जगभर झाला. अगदी दाराजवळ येऊन ठेपला आहे.  पुण्यात रहिवासी असलेल्या जावई-लेकींनी शहराच्या गर्दीत नको. आता गावाकडेच चला, असे म्हणत ग्रामीण भागातील गावांचा रस्ता धरला आहे. भागातील बरचशे लोक सराफी,गलाई व्यासायासाठी पुण्यासह अन्य ठिकाणी स्थायिक असलेली कुटुंबे गावाकडे परतताना दिसत आहेत.

तालुक्‍यातील टेंभुचा बागायती भाग सोडला, तर अनेक गावे दुष्काळी म्हणूनच ओळखली जातात. मुबलक पाणी, रोजगार निर्मिती, दळण-वळण अशा अपुऱ्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक मुली शहरी भागात नांदायला गेल्या. दुष्काळाचा सामना करीत जे आपण भोगले आहे. त्या यातना मुला-मुलींच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणून लग्नानंतरच्या आयुष्यात शहरी भागाला पसंती दिली जात होती. 

शहरी भागात दिवसेंदिवस होत असलेली गर्दी, वाढते प्रदूषण, अपघात आणि त्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाचे वाढते प्रमाण यामुळे खेड्यातील जीवनच आरोग्यदायी असल्याच्या मताला अनेकांकडून शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. त्याला कोरोनो रोगाच्या भितीने बळ मिळाले आहे. गलाई व्यावसायिकांचे बरचशे व्यवसाय इतर देशातही सुरु आहेत. त्यांची मुले मली गावाकडे आल्यानंतर मोठ्या कौतुकाने त्यांच्याकडे पाहिले जात होते. परंतु कोरोनाच्या भितीने फॉंरेन रिटर्न हवा गेली आहे. 

"फॉरेन रिटर्न' ची हवा गेली 

नोकरी, गलाई व्यवसायानिमित्त ग्रामीण भागातील अनेक तरुण परदेशात जातात. ग्रामीण भागातील सोहळ्यानिमित्त ते थाटात उपस्थित राहतात. त्यावेळी फॉरेन रिटर्न ही कुजबुज प्रतिष्ठेची वाटायची. आता मात्र परिस्थिती उलटी आहे. फॉरेन रिटर्न म्हटलं, की कोरोनाची लागण तर झाली नसेल ना ? अशा संशयाने त्यांच्याकडे पाहिले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT