पश्चिम महाराष्ट्र

देशासाठी समान विचारधारा असलेल्या लोकांनी एकत्र यावे - अण्णा हजारे

मार्तंडराव बुचुडे

राळेगणसिद्धी (नगर) : स्वतंत्र्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. देशात आपलीच सत्ता यावी यासाठी प्रत्येक पक्ष कोणत्याही थराला जात आहे. राजकारण्यांमध्ये सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता अशी स्पर्धा सुरू झाली आहे. अनेक राजकारणी समाज व देशहितापासून दूर जाऊ लागले आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न व लोकपाल आणि लोकायुक्त कमजोर करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने देशातील जनतेला धोका दिला आहे. त्या साठी शेतकऱ्यांचे व देशातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी समान विचारधारा असलेल्या लोकांनी एकत्र यावे असे अवाहन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.     

हजारे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सध्याच्या राजकारणीमंडळींमध्ये सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. आपल्या स्वार्थापायी ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळून दिले तुरुंगवास सहन केला व देशासाठी बलिदान दिले त्यांचा विसर पडला आहे. त्यामुळे स्वातंत्र मिळून 70 वर्षे झाली आहेत. मात्र देशाची अवस्था कशी झाली आहे हे आपण पहात आहातच असेही पत्रकात म्हटले आहे.   

स्वातंत्र्यांनतर भ्रष्टाचार वाढला आहे. सरकारी तिजोरी राजरोस लुट सुरू आहे. संविधाप्रमाणे देशात समानता आणणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. उलट श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. नैसर्गिक साधन संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी सरु आहे. यातून दिसणारा विकास कायमचा नसून विनाश जवळ येत आहे व तो प्राणीमात्रास घातक आहे.     

सत्ता आणि पैशाच्या नशेत राजकारणी बेहोश झाले आहेत. या नशेत समाजाला आपण कोठे घेऊन चाललो आहोत याची त्यांना जाणीव नाही. यातून देश विनाशाच्या जवळ जात आहे. याचा परिणाम गरीब लोकांवर होणार आहे. म्हणून ज्या भारतीयांना वाटते हा देश आपला आहे, स्वातंत्र्यासाठी हजारो देशभक्तांनी आपले बलिदान दिले आहे, त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये अशा लोकांनी आपले कुटुंब चालवता चालवता दिवसाचे एक किंवा दोन तास देशासाठी द्यावेत असे वाटते. अशा लोकांनी त्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे.     

आपण अता आपल्या देशाला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही तर इंग्रज भारतात परत येणार नाहीत. मात्र अत्ताचे भारतीय सत्ताधिश हुकुमशाहीच्या बाजूला चालले आहेत ते देशात हुकुमशाही आणतील. देशाला स्वातंत्र मिळून 70 वर्षे झाली मात्र देशात लोकशाही आली नाही.     

देशात अनेक समस्या आहेत. त्यासगळ्या एकाच वेळी सुटणार नाहीत. मात्र समान विचारसरणी असणारे व निष्काम भावनेने एकत्र आले तर हळू हळू देशाच्या समस्यांचा सुटत जातील. ज्यांना देशाच्या समस्यांविषयी चिंता आहे जो देशाचा व समाजाचा विचार करतो ज्याचे जीवन व चारित्र्य शुद्ध आहे तसेच देशासाठी त्याग करण्याची इच्छा आहे मात्र कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा नाही अशी लोकांनी एकत्रीत येऊन संघटण करावे व 23 मार्च रोजी दिल्लीत होणा-या आंदोलनात सहभागी व्हावे असे अवाहन पत्रकात केले आहे.          

मी आत्ता पर्यंत 22 राज्यात जन जागगृती सभा घेतल्या आहेत. तेथे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचे चांगले संघटन झाले व जनतेचा सरकारवर दबाव निर्माण झाला तर सर्व प्रश्न सुटण्यास मदत होईल. म्हणून कार्यकर्त्यांनी आपले प्रतिज्ञापत्र द्यावे म्हणजे त्यांच्यावर राज्याची, जिल्ह्याची किंवा तालुक्याची जबाबदारी देता येईल असेही शेवटी हजारे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT