MID DAY GRAIN.jpg
MID DAY GRAIN.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

माध्यान्ह भोजनचे धान्य मुलांना वाटा 

सकाळवृत्तसेवा

सांगली- माध्यान्ह भोजन योजने अंतर्गत शिल्लक असलेला तांदूळ, डाळी, तेल व अन्य साहित्य शालेय विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करावे, असे आदेश राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज काढले आहेत. 

राज्यात "कोरोना' विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, खासगी शाळा आणि अंगणवाड्या सध्या बंद आहेत. राज्य शासनाने 31 मार्चपर्यंतचा बंद यापूर्वीच घोषित केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत देशात "लॉक डाऊन' जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शाळेतील शिल्लक माध्यान्ह भोजन योजनेचे साहित्य मुलांना मिळावे यासाठी उच्च न्यायालयाने 18 मार्च 2020 रोजी अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप नियमित करावे असे आदेश दिलेले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने माध्यान्ह भोजन योजनेचे साहित्य वाटपाची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, संबंधित शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवलेली आहे. या निर्णयाची कार्यवाही करताना पोलिस तसेच जिल्हाधिकाऱ्यांना लेखी माहिती कळवावे असेही शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी आदेशात म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

SCROLL FOR NEXT