पश्चिम महाराष्ट्र

महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण

सकाळवृत्तसेवा
नगर : ""गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी घोटाळा केला म्हणूनच चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली; पण आधी त्यांचा राजीनामा घ्यावा, मगच चौकशी करावी,'' अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी चव्हाण येथे आले होते. मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
चव्हाण म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "ना खाऊंगा, ना खाने दूँगा' अशी घोषणा करून सत्ता मिळविली; मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते गैरव्यवहार करत आहेत. एकनाथ खडसे, प्रकाश महेता यांचे घोटाळे बाहेर आले. अजून काही मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत. महेता यांनी गैरव्यवहार केला म्हणूनच सरकारने चौकशीची घोषणा केली. पदावर असल्यावर पारदर्शक चौकशी होणार नाही. त्यासाठी आधी त्यांना पदावरून दूर करा.''

""राज्य सरकारची कर्जमाफी द्यायची तयारीच नव्हती; पण शेतकऱ्यांच्या व विरोधी पक्षांच्या दबावामुळे कर्जमाफी द्यावी लागली. त्यातही किचकट नियम लावल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. अजूनही नेमकी कोणाला कर्जमाफी मिळणार, हे शेतकऱ्यांसह राजकीय लोकांनाही कळत नाही. एवढे पैसे कोठून आणणार, याचे नियोजनही सरकारकडे नाही,'' अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
""सरकारने जसा शेतकरी आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न मराठा मोर्चाबाबत सुरू आहे. काही लोकांना बोलावून फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,'' असा आरोप चव्हाण यांनी केला. मराठा समाजाच्या मागण्यांकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT