पश्चिम महाराष्ट्र

महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण

सकाळवृत्तसेवा
नगर : ""गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी घोटाळा केला म्हणूनच चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली; पण आधी त्यांचा राजीनामा घ्यावा, मगच चौकशी करावी,'' अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी चव्हाण येथे आले होते. मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
चव्हाण म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "ना खाऊंगा, ना खाने दूँगा' अशी घोषणा करून सत्ता मिळविली; मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते गैरव्यवहार करत आहेत. एकनाथ खडसे, प्रकाश महेता यांचे घोटाळे बाहेर आले. अजून काही मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत. महेता यांनी गैरव्यवहार केला म्हणूनच सरकारने चौकशीची घोषणा केली. पदावर असल्यावर पारदर्शक चौकशी होणार नाही. त्यासाठी आधी त्यांना पदावरून दूर करा.''

""राज्य सरकारची कर्जमाफी द्यायची तयारीच नव्हती; पण शेतकऱ्यांच्या व विरोधी पक्षांच्या दबावामुळे कर्जमाफी द्यावी लागली. त्यातही किचकट नियम लावल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. अजूनही नेमकी कोणाला कर्जमाफी मिळणार, हे शेतकऱ्यांसह राजकीय लोकांनाही कळत नाही. एवढे पैसे कोठून आणणार, याचे नियोजनही सरकारकडे नाही,'' अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
""सरकारने जसा शेतकरी आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न मराठा मोर्चाबाबत सुरू आहे. काही लोकांना बोलावून फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,'' असा आरोप चव्हाण यांनी केला. मराठा समाजाच्या मागण्यांकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi Statement : ''भारतात मुस्लिम लोकसंख्या कधीही हिंदूंपेक्षा जास्त होणार नाही'' ; ओवेसींचं मोठं विधान!

Sunetra Pawar: ''शपथविधीचा निर्णय पवार कुटुंबाचाच'', राष्ट्रवादीच्या मंत्र्याचं मोठं विधान; पटेल, तटकरेंचा दोष नाही?

TET Exam Update: शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘टीईटी’साठी मिळणार अधिक संधी; शासन बदलणार जीआर

ZP Elections 2026 Voting Live Update : बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केले

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

SCROLL FOR NEXT