jayant patil.jpeg
jayant patil.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

मंत्री जयंतरावांनी साधला तिच्याशी संवाद!

धर्मवीर पाटील

इस्लामपूर-डोळ्याने अंध असूनही ध्येय, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रेडिओवर आरजे होण्याचे स्वप्न पाहून ते साकार करणाऱ्या शितल साळुंखे या युवतीशी मंत्री जयंत पाटील यांनी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने फेसबुकवर लाईव्ह संवाद साधला. शीतलच्या जडणघडणीविषयी प्रश्न विचारून तिला बोलते केले आणि नंतर शीतलच्या प्रश्नांनाही रोखठोक उत्तरे दिली. महाराष्ट्रात आमच्या सरकारच्या काळात कायदा, सुव्यवस्था राहील आणि माता भगिनींच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत कुणीही करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला.

महिला दिनाच्या निमित्ताने 'ती' चा दृष्टिकोन या शीर्षकाखाली मुंबई येथे ही फेसबुक लाईव्ह मुलाखत झाली. अंध असूनही शीतलने आरजे बनण्याचे पाहिलेले स्वप्न, आलेल्या अडचणींवर केलेली मात, आरजेच का बनायचे होते? त्याकडे तुझा प्रवास कसा झाला? अवयवदान विषयावर असणारे समाजातील न्यूनगंड, लोकांची मानसिकता अशा अनेक विषयांवर मंत्री पाटील यांनी तिला बोलते केले. शितलने जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर पर्ल संस्थेत काम करताना सामाजिक व्यासपीठ मिळाले आणि तिथून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. एक अंध व्यक्ती नेत्रदानाविषयी बोलते तेव्हा समाजाच्या संवेदना जाग्या होतात आणि लोक प्रतिसाद देतात, असा अनुभव तिने सांगितला.

समाजात बदल घडवायचा असेल तर सकारात्मक पाऊल टाकून सुरवात केली पाहिजे, असेही ती म्हणाली. प्रिन्स आणि परी या दोघांचे सान्निध्य तिच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्याचे तिने सांगितले. तिच्या प्रश्नांना उत्तरे देताना जयंत पाटील म्हणाले की, "निर्भया प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे होते. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायलाच हवी. परभणीसारख्या ठिकाणी पेट्रोल पंप मुलीच चालवतात हे आश्वासक आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आरक्षण मिळाले. त्याचा चांगला फायदा होत आहे; परंतु अजूनही काही ठिकाणी मानसिकता नकारात्मक असल्याने मागासलेपण आहे. पण हळूहळू त्यात बदल नक्की होईल. परिवर्तन एका रात्रीत होत माही, त्याला वेळ द्यावा लागतो. महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणी केल्याने त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराला न्याय मिळेल. तरीही पोलीस दाद देत नसतील तर त्यांनी आमच्या सरकारशी किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला संपर्क साधावा, आम्ही जरूर न्याय मिळवून देऊ. महिलांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, अशी व्यवस्था आमचे सरकार निर्माण करेल."


आरक्षण मिळाले, महिला राजकारणात सक्रिय झाल्या; परंतु अजूनही त्यांच्या कारभारात काही पुरुष जाणीवपूर्वक लुडबुड करताना दिसतात यावर जयंतराव उपरोधिकपणे म्हणाले की, "अशा महिलांचे सदस्यत्व रद्द करण्याचा इशारा आम्ही दिला होता. त्यावर महिला आता शहाण्या झाल्या आहेत. त्या नवऱ्यांना दाद देत नाहीत. नवरे बिचारे डबे घेऊन बाहेर बसलेले असतात आणि महिला निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, हे आश्वासक चित्र आहे."  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT