Railway esakal
पश्चिम महाराष्ट्र

‘मिरज-सोलापूर’, ‘कोल्हापूर-सोलापूर’ बंदच

रेल्वेच्या उत्पन्न वाढीसाठी विस्तारवाढ गरजेची; लोक प्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

शंकर भोसले

मिरज : आध्यात्मिक आणि वैद्यकीयनगरीला जोडणारी सोलापूर-कोल्हापूर, मिरज-सालापूर ही रेल्वे सेवा तब्बल दोन वर्षापासून बंद आहे. रेल्वे संघटना, रेल्वे प्रवाशांकडून वारंवार मागणी करून देखिल याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सोलापूर, माढा या लोकसभा मतदार संघातील लोक प्रतिनिधींनी रेल्वे गाड्या सुरू करण्याबाबात कोणतीच ठोस भुमिका अथवा तारांकीत प्रश्न उपस्थित केल्याचे कधी दिसलेच नाही.

सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-मिरज गाड्यांमुळे आध्यात्मिक आणि वैद्यकीयनगरी गेली दोन वर्षे संपर्कहीन बनली आहे. या ठिकाणचा व्यापार, शेती, उद्योग व्यवहार आणि रोजगाराचे प्रमुख्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोना आधीच बंद करण्यात आलेली कोल्हापूर-सोलापूर गाडीचा सोलापूर ते गुलबर्गापर्यंत विस्तार केल्यास नक्कीच कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि कर्नाटकातील गुलबर्गा येथील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. या मार्गावरील आध्यात्मिक क्षेत्र असलेल्या अक्कलकोटचे अक्कलकोट रोड स्टेशन आणि दत्त महाराजांचे गाणगापूर रोड स्टेशन आणि मुस्लिम धर्मीयांचे गुलबर्गा येथील देवस्थानासाठी प्रवाशांना थेट जाता येणार आहे.

तर सोलापूर-मिरज रेल्वेचा कराड पर्यंत विस्तार करण्याची मागणी आहे. या दोन्ही गाड्यांचे विस्तारीकरण रखडल्यानेच उत्पन्नात घट होत असल्याचे अनेक संघटनांनी अभ्यासाअंती सांगितले आहे. विस्तार केल्यास नक्कीच गाडी फायद्यामध्ये धावू शकते असे रेल्वे संघटनांचे मत आहे. याबाबत वेळोवेळी मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय अधिका-यांकडे निवेदने देण्यात आली आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यामध्ये या मार्गावरील रेल्वे सेवा तसेच बेळगाव, कोल्हापूर, पंढरपूर येथील रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित भुमिकेमुळे प्रवाशांना जादा भाडे देऊन खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.

प्रवाशांची सोय...

कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस कोल्हापूर ते गुलबर्गा अथवा हैदराबाद पर्यंत विस्तार केल्यास नक्कीच गाडीची उत्पन्न वाढेल. शिवाय अक्कलकोट, गाणगापूर या तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल. यामुळे अर्थातच उत्पन्न वाढेल, यामुळे कोल्हापूर-सोलापूरचा विस्तार करणे गरजेचे आहे

कोल्हापूर-सोलापूर, मिरज-सोलापूर रेल्वे सेवा सुरू करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून काना-डोळा केला जात आहे. कमी उत्पन्नाचे कारण देत कोल्हापूर-सोलापूर रेल्वे बंद आहे. तर मिरज-सोलापूर एक्स्प्रेस रेल्वे गाडी गेली दोन वर्षे गाडी बंद आहे.

- किशोर भोरावत, रेल्वे प्रवासी सेना, मिरज

सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील प्रवासी, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त ठरणारी सोलापूर-मिरज, सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस सुरू करण्यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली आहेत. मात्र यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पाच लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या या गाड्या आहेत. मात्र लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या गाड्या बंद आहेत.

- संजय पाटील, रेल्वे संघटना, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT