पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : सांगलीची जागा स्वाभिमानीकडेच, पण निर्णय उद्या

पंडित कोंडेकर

इचलकरंजी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दुसरी जागा मिळाली तरच आम्ही काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये आहोत. सांगली आणि शिर्डी या पैकी एका जागेची आम्ही मागणी केली आहे. सांगलीची जागा जवळपास निश्‍चित झाली आहे. उद्या याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर होईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

श्री.शेट्टी म्हणाले,""सुरुवातीला आम्ही काँग्रेस आघाडीकडे सहा जागांची मागणी केली होती. चर्चेनंतर आम्ही प्रथम तीन व त्यानंतर दोन जागेवर आलो आहोत. हातकणंगलेच्या जागेबद्दल कोणाचाच वाद नाही. शिर्डी अथवा सांगली यापैकी एक जागेची आमची मागणी आहे. मात्र ती निर्वेध करुन दिली पाहीजे, असा आमचा आग्रह आहे.""

श्री. शेट्टी म्हणाले, आम्ही 15 जागा लढविण्याची तयारी केली होती. पण महाआघाडीत गेल्यानंतर दोन जागा घेण्याचे निश्‍चित झाल्यानंतर 12 जागेवर आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही थांबविले आहे. बंडखोरीमुळे मतविभागणीचा फायदा आम्ही विरोधकांना होवू देणार नाही. त्यासाठी आमचे कितीही नुकसान झाले तरी चालेल. आम्ही कोठेही बंडखोरी करुन महाआघाडीला अपशकून करणार नाही.""

वारणा पाणी योजनेसाठी केंद्र शासनाने निधी दिला आहे. या योजनेच्या उद्‌घाटनाला मला बोलविले नाही. पण पाणी दिले नाही, म्हणून नाहक मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा कांहीजणांचा प्रयत्न सुुरु आहे. राजकारणांमुळे वारणा प्रश्‍न गुंतागुंतीचा बनला असून शेतकऱ्यांना विश्‍वासात घेतल्यानंतर हा प्रश्‍न सुटणार आहे, असे सांगत शहरातील यंत्रमाग उद्योगासाठी केंद्र शासनाकडून 350 कोटी रुपयांचे अनुदान मिळवून दिले असल्याचा दावा यावेळी श्री. शेट्टी यांनी केला.

ऊसदराबाबतची भूमिका कायम राहणार
ऊसदराबाबत कोणतीही भूमिका बदलणार नाही. साखर कारखान्यांनी एफआरपी कोणत्याही परिस्थितीत दिली पाहिजे, ही आमची मागणी कायम आहे. त्यासाठी निवडणूकीनंतर पून्हा मैदानात उतरणार आहे, असे खासदार शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT