पश्चिम महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत जनविरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचणार

सकाळवृत्तसेवा

सांगली - लोकसभा निवडणुकीत ९ ते १२ जागा येतील, अशी आम्हाला खात्री होती. मात्र चार जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले.  लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम असते, सर्वोच्च असते ! जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. जनतेचा  कौल मिळवून अविश्वसनीय विजय संपादित केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन !, असे व्टिट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

राज्यात भयानक दुष्काळ पडला असून राज्य सरकार गेली पाच वर्षांप्रमाणे आजही बेफिकीरपणे कारभार करते आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत या जनविरोधी राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी कष्ट घेणाऱ्या सर्व लाखो कार्यकर्त्यांचे आणि सर्व स्थानिक नेत्यांचे आभार मानतो. केवळ लोकसभा निवडणुकीच्या काळातच नव्हे तर गेली पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी आणि मूलतत्त्ववादी विचारसरणीच्या परभावसाठी जी मेहनत सर्व कार्यकर्त्यांनी घेतली ती अजोड होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे चार खासदार निवडून आले त्याचे संपूर्ण श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे व स्थानिक नेत्यांचे आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्या नऊ ते बारा जागा येतील अशी आम्हाला खात्री होती. मात्र चार जागांवर आम्हाला समाधान मानावे लागले. पाच वर्षांत भारताचं संविधान, धर्मनिरपेक्षता व बहुसांस्कृतिकता यांच्या गळ्याला नख लावण्याचे भरपूर प्रयत्न झाले. आम्ही भ्रष्टाचार, महागाई व बेरोजगारीच्या विरोधात आपण प्रामाणिकपणे लढलो, यापुढेही लढत राहू.

देशभरात ईव्हीएम बाबतीत विविध गैरप्रकार समोर आले आहेत. त्यावर कायमस्वरूपी समाधान काढणे गरजेचे आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक न झाल्यास देशातील जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडून जाईल. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमधील चर्चेचा अवकाश पूर्णपणे वेगळा असेल. राज्यात भयानक  दुष्काळ पडला असून राज्य सरकार गेली पाच वर्षांप्रमाणे आजही बेफिकीरपणे कारभार करते आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत या जनविरोधी राज्य सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: फिलिप सॉल्टची तुफानी फटकेबाजी, दिल्लीविरुद्ध ठोकलं आक्रमक अर्धशतक

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT