shiv.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

शिवसेनेत गटबाजीला वाव नाही : निलम गोऱ्हे 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शिवसेनेत गटबाजीला स्थान नाही. बंडखोरांवर पक्षाकडून कारवाई केली जाईल असे शिवसेनेत्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी गुरुवारी सोलापुरात सांगितले. 

शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत आणि समन्वयक शिवाजी सावंत यांच्याविषयी असलेल्या नाराजीबाबत प्रश्‍न विचारल्यानंतर शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी अधिक बोलणे टाळले. याविषयी अधिक बोलण्यास सावंत बंधू समर्थ आहेत. तेच बोलतील असे त्या म्हणाल्या.

महेश कोठे शिवसेनेत नवीन होते, तेव्हा त्यांना पक्षाने काय स्थान दिले हे सर्वांना माहिती आहे. त्यांच्यामुळे जुन्या लोकांना डावलले तेव्हा त्यांना वेदना झाली असेल? असा सवाल करून त्यांनी बंडखोरी केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर आणि समर्थकांवर पक्षाकडून कारवाई होईल असे सांगितले. 

कोठेंविषयी अधिक प्रश्‍न विचारल्यानंतर गोऱ्हे यांनी बोलणे टाळून आता हे कोण कोठे असा प्रश्‍न विचारायला लावू नका असे म्हणून पत्रकारांना गप्प केले. येत्या 14 ऑक्‍टोबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने राजकीय इच्छाशक्ती संपवली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनावर पुष्पवृष्टी केली यावरही त्या बोलल्या. शिवशक्ती-भिमशक्तीची भूमिका आजही कायम आहे. ज्यावेळी महायुतीची घोषणा झाली तेव्हाच महाराष्ट्रवर भगवा फडकला आहे, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोलवर कोटा लागणार? भारतात इंधन रेशनिंगची चर्चा; तुमच्या गाडीला किती लिटर इंधन मिळणार? आठवड्याला फक्त…?

IPL 2026 : श्रेयस अय्यर - अर्शदीप सिंग यांच्यात कडाक्याचे भांडण? प्रीती झिंटाला करावा लागला खुलासा

Workplace Love: ऑफिसमध्येच प्रेमाच्या गाठी जुळतात! पण किती टक्के लोक वर्कप्लेसमधील पार्टनरसोबत लग्न करतात? रंजक आकडेवारी समोर

कोणताही शेतकरी स्वखुशीने माल टाकून देत नाही... प्रवीण तरडेंनी सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाले, 'लोक म्हणतात शेतकरी माजलाय...

आधी आणि आता: भारतातील खाजगी मालमत्ता व्‍यवस्‍थापन कसे बदलले

SCROLL FOR NEXT