one dead in accident athani belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव :अथणीत भीषण अपघातात एक ठार, दोन गंभीर 

सकाळ वृत्तसेवा

अथणी : येथील अनंतपूर रस्त्यालगत बसवेश्वर चौकात दुचाकीला टिप्परने धडक दिल्याने झालेल्या अपघातातत एक जण जागीच ठार झाला तर दोघे जखमी झाले. मंगळवारी (ता. १) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सागर परशराम मादर (वय 20, रा. कृष्णा कित्तूर, ता. कागवाड) असे मयताचे नाव आहे. अथणी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, अथणी येथील बसवेश्वर चौकात रोज सायंकाळी गर्दी असते. यावेळी ओव्हरटेक करताना खडी भरून निघालेल्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. त्यात सागर मादर हा चाकात अडकून जाग्यावरच ठार झाला तर इरशाद सय्यद सनदी (वय 20, रा. किरणगी, ता. अथणी) आणि लखन गणपती मादर (वय २१, रा. ऐगळी, ता. अथणी) हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी मोठी गर्दी झाली होती. अथणी सरकारी दवाखान्यात प्रथमोपचारानंतर जखमींना मिरज येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अथणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.  


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mharashtra Politics : छगन भुजबळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; राजकीय हालचालींना वेग

Virat Kohli Instagram account is active ‘किंग कोहली इस बॅक ऑन इन्स्टा’ ! लाखो फॉलोअर्सचा जीव भांड्यात पडला; जाणून घ्या, नेमकं काय झालं होतं?

डोंबल्याचा अविश्वसनीय विजय! आकाश चोप्राने पाकिस्तानी पंतप्रधान शेहबाझ शरिफ यांची घेतली फिरकी; म्हणाला, ऑस्ट्रेलियाच्या B टीमविरुद्ध...

'मी एवढे काम करतो, पण खंत आहे की गालबोट का लागतं?' अजित पवारांना कायम असणारी खंत | Ajit Pawar Passed Away | Sakal News

India-Arab Foreign Ministers Meet : इस्लामिक राष्ट्रांच्या नेत्यांना एकाचवेळी दिल्लीत बोलवण्यामागे मोदी सरकारची रणनीती काय?

SCROLL FOR NEXT