accident 
पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूरच्या उद्योजकाचा अपघाती मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : येथील युवा उद्योजक सागर राजेंद्र दोशी (वय 31) यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. नदीच्या पलीकडील तीन रस्ता चौकात सागर दोशी यांची कार उलटली होऊन अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर दोशींचा मृत्यू झाला तर गाडीतील अन्य दोघे जखमी झाले आहेत. 
या अपघाताची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, येथील महालक्ष्मी मसालेचे उत्पादक तसेच लिंक रोडवरील महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी (रा. भादुले चौक, पंढरपूर) हे त्यांच्या अन्य काही सहकाऱ्यांसोबत परगावी गेले होते. मोहोळ- पंढरपूर रस्त्यावर एका हॉटेलमध्ये जेवण करून हे सर्वजण पंढरपूरकडे येत होते. 
सागर दोशी हे स्वतः गाडी चालवत होते. तालुक्‍यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत तीन रस्ता चौकाजवळ गाडीचा पुढचा डाव्या बाजूचा टायर फुटल्याने गाडी उलटून अपघात झाला. या अपघातात सागर दोशी तसेच गाडीतील बाळू धोत्रे (वय 37, रा. महावीरनगर, पंढरपूर) व सोमनाथ टरले (वय 32, रा. पंढरपूर) 
हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. सागर दोशी यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या अपघात प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक किरण अवचर पुढील तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT