One hundred percent penalty waiver for overdue property holders 
पश्चिम महाराष्ट्र

थकीत मालमत्ता धारकांसाठी शंभर टक्के दंड माफी

बलराज पवार

सांगली : महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी अभय योजना सुरू केली असून या अंतर्गत शंभर टक्के दंड माफी केली जाणार आहे. ही योजना 31 मार्चपर्यंतच आहे. पुन्हा राबवण्यात येणार नाही. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

आयुक्त कापडणीस म्हणाले,""गेल्या दोन आर्थिक वर्षात महापूर आणि कोविड काळात नागरिकांचे उत्पन्नाचे स्रोत बंद झाले होते. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ता कर नागरिकांना भरता आले नाही. यामुळे नागरिकांच्या मालमत्ता करायच्या दंड शास्तीमध्ये वाढ होत गेली होती. 

महापालिकेने नागरिकांना कर भरण्यात सवलत मिळावी या उद्देशाने 2021 मध्ये अभय योजना लागू केली आहे. या योजनेत नागरिकांना मालमत्ता व अन्य कराच्या दंड शास्तीमध्ये 100 टक्के माफी दिली जाणार आहे. ही अभय योजना 31 मार्च पर्यंतच सुरू राहणार असून त्यानंतर ही योजना बंद केली जाणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्यापि आपले महापालिकेचे कर भरले नाहीत त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन दंडशास्ती माफी करून भरून सहकार्य करावे.

 31 मार्च नंतर जे नागरिक मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता जप्ती, मालमत्तेला महापालिकेचे नाव लावणे यासह प्रसंगी मालमत्तेचा लिलाव करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अभय योजनेचा लाभ घेऊन नागरिकांनी दंड शास्ती माफी घेऊन थकीत मालमत्ता कर वेळेत भरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT