The papers came, the leaves of the palms became obsolete
The papers came, the leaves of the palms became obsolete 
पश्चिम महाराष्ट्र

कागदी आल्या, पळसाच्या पत्रावळ्या झाल्या कालबाह्य 

भगवान शेवडे

मांगले : जेवणाच्या पंगतीत पळसाच्या पानाच्या पत्रावळीवर जेवण्याची चव वेगळीच होती. आता फास्ट फूड संस्कृतीमुळे कागदी पत्रावळ्या आल्या आणि पत्रावळीवर मिळणारा येळून काढलेला स्वादाचा भात आणि शेक कालबाह्य झाले आहे. गुरव समाजातील लोक पळसाच्या पानांना ज्वारीच्या ताटाच्या चुया काढून गोल आकाराची पत्रावळी बनवत असत, घटस्थापनेवेळी गुरव लोक घरोघरी याच पत्रावळ्या पुरवत होते. आजही ग्रामीण भागात घटस्थापनेवेळी या पत्रावळ्या पहावयास मिळत आहेत. मात्र त्या पंगीतून हद्दपार झाल्या आहेत. 

आता कागदी - प्लॅस्टीक पत्रावळीवर पंगती झडू लागल्या. पण पळसाच्या पानाची द्रोण-पत्रावळी नसल्यामुळे कागदी पत्रावळीवर पाच पक्वान असूनही त्याची चव आणि स्वाद घेता येत नाही. पळसाच्या पानावरील पत्रावळीवर वाढलेला येळलेला भात आणि भाताच्या उंड्याची टाळू फोडून त्यावर द्रोणा शिवाय वाढलेली शेक तृप्त जेवण झाल्याची खून असायची. 

बहुतेक समारंभात तांब्याचे मोठे हंडे त्याला उचलण्यासाठी बांधलेली काठ्यांची शिकाळी आणि हंड्यात मिठा शिवाय शिजवून कामठी पाटीत मसाल्या शिवाय येळलेला भात फाईव्ह स्टार हॉटेल मधल्या चांदीच्या थाळीलाही लाजवणाऱ्या चवीचा असायचा. आज मात्र पत्रावळी आणि हा येळलेला भात फक्त डोळ्यासमोर आला तर तोंडाला पाणी सुटल्या शिवाय राहत नाही.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT