The patience of the masses is exhausted; Start the road work 
पश्चिम महाराष्ट्र

जनतेची सहनशीलता संपली आहे; रस्त्याचे काम सुरू करा

संजय गणेशकर

पलूस : विजापूर - गुहागर महामार्गाचे पलूस तालुक्‍यातील काम चार वर्षांपासून रखडले आहे. खराब रस्त्यांमुळे लोक वैतागलेत. अपघात वाढलेत. जनतेची सहनशीलता संपली आहे. रस्त्याचे काम त्वरीत सुरू करा. अन्यथा जनता रस्त्यावर येईल. त्या परिस्थितीला तुम्ही जबाबदार असाल, असा इशारा कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी महामार्ग समितीच्या अधिकाऱ्यांना दिला. डॉ. कदम यांनी त्यांची खरडपट्टी काढली. अधिकाऱ्यांनाही बोलताही आले नाही. 

येथे विजापूर-गुहागर महामार्गाचे पलूस तालुक्‍यातील रखडलेल्या कामाबाबत मंत्री डॉ. कदम यांनी राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश सागांवकर व इतर अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन स्थितीची माहिती घेतली. डॉ. कदम व जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र लाड आक्रमक झाले होते. 
तुपारी फाटा ते येळावी फाटा येथील काम रखडले आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. चार-पाच वर्षापासून काम सुरू आहे. वाहन चालवणे अवघड झाले आहे. अनेक अपघात होत आहेत. काहींना जीव गमवावा लागला. त्याचे अधिकाऱ्यांला देणे-घेणे नाही. काम त्वरीत पूर्ण करा अन्यथा तालुक्‍यातील जनता रस्त्यावर येईल. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक घेणार आहे, असे डॉ. कदम यांनी सांगितले. 

श्री. सागांवकर यांनी पहिली निविदा रद्द करून नविन डांबरीकरणाचा प्रस्ताव पाठवला आहे. खड्डे बुजवून कारपेट करण्यात येईल. काम पंधरा दिवसांत होईल, असे सांगितले. लाडही आक्रमक होते. त्यांच्या प्रश्नांची अधिकारी योग्य उत्तरे देऊ शकले नाहीत. काम अडवलं म्हणून कारवाई करताता. तीच तत्परता काम पूर्ण करण्यासाठी का दाखवत नाही? असा सवाल त्यांनी केला. 
 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra E-Bond: कागदी बाँडला रामराम; ई-बाँडची सुरुवात, महायुती सरकारचा मोठा निर्णय, फायदे काय?

Arattai vs WhatsApp: स्वदेशी ॲप ‘Arattai’ कोणत्या बाबतीत आहे ‘WhatsApp’पेक्षा वरचढ!

Vande Bharat Train Accident : दसरा उत्सवावरुन परतणाऱ्या पाच तरुणांना 'वंदे भारत' ची धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू, १ गंभीर जखमी

Sindhudurg tourists drowned : मोठी बातमी! सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

Latest Marathi News Live Update: शिरोडा वेळागर समुद्रात ८ पर्यटक बुडाले, बचाव कार्य सुरू

SCROLL FOR NEXT