Pay insurance grain protection to ration grain shopkeepers 
पश्चिम महाराष्ट्र

रेशन धान्य दुकानदारांना विमा संरक्षण, प्रलंबित कमिशन तत्काळ द्या.... 

विष्णू मोहिते

सांगली : राज्यातील रेशन धान्य दुकानदारांनी 1 सप्टेंबर पासून संप पुकारला आहे. दुकानदारांना विमा संरक्षण द्यावे तसेच धान्य वाटप केलेले प्रलंबित कमिशन तात्काळ मिळावे यासाठी जिल्ह्यातील दुकानदारानी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले. जिल्ह्यातील रेशन दुकानदारांची संख्या 1356 आहे. 

सध्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. दैनंदिन व्यवहार करणे मुश्‍कील झाले आहे. आमची दुकाने अत्यावश्‍यक सेवेत येतात. एप्रिल ते माहे जुलै पर्यंत राज्य शासनाने दुकानदार यांच्या थमवर धान्य वाटपास परवानगी दिली होती. तसे धान्य वाटप झाले आहे. सध्या ऑगष्ट महिन्यापासुन शिधापत्रिकाधारकांच्या थमवर धान्य वाटप करावे असे आदेश काढले आहेत. या आदेशा विरुध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पॉज मशिन वर धान्य वाटप करु नये, असा आदेश दिला आहे. मुंबई उच्च न्यायालय येथे रास्त भाव दुकानदार यांना इतरा प्रमाणे विमा संरक्षण कवच द्यावे, अशी मागणी केली आहे. 

धान्य दुकानदार यांनी माहे जुनमध्ये केसरी शिधापत्रिका धारकांना धान्य वाटपाचे मजुरी घेवुन चलनाने पैसे भरलेले आहेत. ते पैंसे किंवा धान्य मिळावे. सुमारे 150 दुकानदार पॉझीटिव्ह आले आहेत. या परिस्थितीमध्ये दुकानदार शिधापत्रिका धारकाचा थम लावुन धान्य वाटप थांबवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाध्यक्ष मुबारक मौलवी, उपाध्यक्ष प्रभाकर कुरळकर, रमजान बागवान, आय. बी. शेख, जयसिंग देसाई, संजय चव्हाण, राजू पखाले यांच्यासह दुकानदार उपस्थित होते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT