pomegranate.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचे 31 कोटी रूपये आले 

सकाळवृत्तसेवा

सांगली-जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलुस आणि खानापूर तालुक्‍यातील डाळींब उत्पादक 12 हजार 343 शेतकरी यांना 31 कोटी 38 लाख रूपये विमा रक्कम मिळणार आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. आटपाडी तालुक्‍यात सर्वाधिक 23 कोटी 24 हजार रुपये तर पलूस तालुक्‍यात सर्वात कमी 40 हजार 700 रूपये विमा रक्कम प्राप्त झाली आहे. 


जिल्ह्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिवर्षी प्रचंड नुकसान होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीची थोड्या प्रमाणात का होईना भरपाई मिळावी यासाठी फळ पिक विमा उतरला जातो. जिल्ह्यात आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्‍यात सर्वाधिक डाळींबाचे उत्पादन घेतले जाते. त्या खालोखाल तासगाव, खानापूर आणि पलूस तालुक्‍यातही डाळींब उत्पादन घेतले जाते. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला होता.

 
डाळींब उत्पादकांसाठी 147 कोटी 9 लाख रुपये विमा संरक्षित करण्यात आला होता. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सात कोटी 35 लाख रुपयांचा हप्ता भरण्यात आला होता. जिल्ह्यातील 12 हजार 156 हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले होते. 
डाळींब पिकांच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील 12 हजार 343 शेतकऱ्यांना पीक विमा रकमेची प्रतिक्षा लागून राहिली होती. त्यांची प्रतिक्षा संपली आहे. 31 कोटी 38 लाख रुपये जिल्हा बॅंकेकडे जमा झाले आहेत. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. सध्या "कोरोना' मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशावेळी दुष्काळी भागातील डाळींब उत्पादकांना पीक विम्याची रक्‍कम मिळणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. 


डाळींब उत्पादकांना मिळणारी भरपाई 
तासगाव तालुका- 11 लाख 75 हजार रूपये, पलुस 40 हजार 06 रूपये, जत 6 कोटी 79 लाख रूपये, कवठेमहांकाळ 1 कोटी 46 लाख रूपये, आटपाडी-23 कोटी 74 लाख रूपये, खानापूर- 1 लाख 16 हजार रूपये याप्रमाणे 31 कोटी 38 लाख रूपये भरपाई मिळणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

SCROLL FOR NEXT