Min-Uday-Samant
Min-Uday-Samant Min-Uday-Samant
पश्चिम महाराष्ट्र

व्यवसाय अभ्यासक्रमासाठी जुलैमध्ये सीईटी: उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोनाच्या covid 19 साथीमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. अशा परिस्थितीत दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेतली आहे. बारावीनंतरच्या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी जुलैमध्ये सीईटी परीक्षा (CET exam)घेतली जाईल, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये लागेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant)यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात योग्य नियोजन केल्याने कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसरी लाट थोपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेनेतर्फे १४ व्हेंटिलेटर वाटप व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत सांगलीत आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.(post-secondary-business-course-cet-exam-in-july-information-higher-and-technical-education-minister -uday-samant-sangli-news)

सामंत म्हणाले, ‘दहावी-बारावीच्या परीक्षा जाहीर झाल्यावर कोरोना रुग्ण वाढल्याने परीक्षा रद्द केल्या. त्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. बारावीनंतरचा व्यवसाय अभ्यासक्रम महत्त्वाचा असतो. व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जुलैत सीईटी आणि ऑगस्टमध्ये निकाल लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहावीनंतर त्यांना थेट पॉलिटेक्निकला प्रवेश देण्यात येईल. दहावीसह कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याबाबत खबरदारी शासन घेत आहे. कोरोना दुसऱ्या लाटेत सांगली जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या अडीच हजारांपर्यंत गेली होती. प्रशासन, नागरिकांच्या सहकार्यामुळे ६०० पर्यंत रुग्णसंख्या घटली. आरोग्य, महसूल, पोलिस सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून कामामुळे दुसरी लाट रोखण्यात यश आले. यामुळे जिल्ह्याच्या जनतेचे मुख्यमंत्र्यांच्या वतीने आभार मानतो. येत्या काही महिन्यांमध्ये तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्याने आतापासून उपाययोजना कराव्यात.’

वादळाच्या मदतीत केंद्राचा दुजाभाव

सामंत म्हणाले, तौक्ते वादळाने कोकणाचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी गुजरातलाही फटका बसला. पंतप्रधानांनी गुजरातची हवाई पाहणी करून तत्काळ १००० कोटींची मदत दिली. राज्याला रुपायाही दिला नाही. हा केंद्राचा दुजाभाव आहे. राज्य सरकारने मात्र एनडीआरएफच्या निकषापेक्षा चारपटीने म्हणजे २५२ कोटी मदत दिली. वादळानंतर २० दिवसांनी केंद्रीय पथक कोकणात आले. पाहणीपेक्षा त्यांनी माशांवर ताव मारला. नाणार प्रकल्प यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आहे. तो प्रकल्प होणार नाही. प्रकल्प रद्द केल्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका बसणार, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र, चार महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये बहुतांशी ग्रामपंचायतीतील शिवसेनेने जिंकल्या आहेत. त्यामुळे तेथील लोक सेनेच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT