Postman 
पश्चिम महाराष्ट्र

लोकांच्या मनात आजही पोस्टमनदादा

जयभीम कांबळे

तळमावले - ब्रिटिश काळापासून चालत आलेले टपाल खाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोचलेले आहे. आजच्या एसएमएस, वॉट्‌सॲप, ई-मेलच्या जमान्यातही टपाल यंत्रणा अन्‌ पोस्टमनदादा आजही लोकांच्या मनात पाय रोवून उभे आहेत. टपाल खात्याची नियमितता, अचूकता, कार्यप्रणाली ही बिनचूक व विश्वासार्ह आहे, यात लोकांच्या मनात कोणतीच शंका नाही. 

टपाल म्हटले की समोर उभा राहतो तो पोस्टमन. ऊन, पावसाची तमा न बाळगता आपल्याला आपल्या प्रियजनांनी पाठवलेले साधे पत्र असो वा स्पीडपोस्ट, रजिस्टर वा पार्सल... प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रामाणिकपणे पोचवतो तो पोस्टमनदादा... अशाच एका पोस्टमनदादाशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पोस्टमनच्या कामाची व त्याला येणाऱ्या अडी-अडचणींची व्यथा मांडली.

तळमावल्यात गेली ३३ वर्षे पोस्टमनचे काम करून ड्यूटी बजावणारे संजय कांबळे हे गावातील प्रत्येक लोकांच्या मनात घर करून आहेत. सध्या ते कऱ्हाड येथील प्रधान डाकघरात सेवा बजावत आहेत. 

टपाल खाते हे ग्रामीण भागातील संपर्काचे महत्त्वाचे साधन आहे. आलेली पत्रे व द्यावयाची पत्रे लोकांना सुखरूप घरपोच करणे हे पोस्टमनचे काम असते. हे काम करताना खात्याकडून पावसाळ्यात छत्री, गमबूट मिळायचे... कांबळे जुन्या आठवणींना उजाळा देत होते. आज कामाचा बोजा जास्त असला तरी आपण एक राष्ट्रहिताचे काम करतोय, याचीही जाणीव त्यावेळी होती अन्‌ आजही आहे. हळूहळू पगार वाढत गेला अन्‌ कामही... पोस्टमनचे काम प्रामाणिकपणे करत राहिलो, असेही त्यांनी नमूद केले.

कोणतेही काम करा. पण, ते प्रामाणिकपणे करा. आपल्या कामातून समाजाचा आणि राष्ट्राचाही फायदा झाला पाहिजे.
- संजय कांबळे, कर्मचारी, टपाल विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT