सांगली ः जिल्ह्यात खरीप हंगामात 19 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेली तीन दिवस सलग पावसानंतर आज दिवसभर हलक्या सरी पडल्या. चार दिवसातील पावसामुळे जिल्हाभर पेरण्यांना गती मिळाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पेरणी भात 82 टक्के, कडधान्य, डाळ पिकांची 14 टक्के तर तेलबीयांची पेरणी 32 टक्के क्षेत्रावर झालेली आहे. तालुकानिहाय पेरणीचा विचार केल्यास शिराळा तालुक्यात 80 टक्के, वाळव्यात 50 टक्के, कडेगावात 34 टक्के, पेरणी झाला. जतला अद्याप पेरणी झालेली नाही. आटपाडी, तासगाव, पलूस तालुक्यात पेरण्यांना जोरच धरलेला नाही.
सांगली जिल्ह्याचे खरीपाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 48 हजार 490 हेक्टर असून त्यापैकी पेरणी किंवा ऊसासह लागण झालेल्याचे क्षेत्र 59 हजार 10 हेक्टर आहे. त्यातील ऊस क्षेत्र वगळता 2.78 लाख हेक्टरपैकी 54 हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. हे प्रमाण 19 टक्के एवढे भरते. डाळी व कडधान्य पिकांमध्ये तूर 6 टक्के, मुग-9 टक्के, उडीज-10 टक्के आणि अन्य कडधान्यांचा 10 टक्के समावेश आहे. तेलबियांमध्ये भूईमूग- 38 टक्के क्षेत्रावर आणि सोयाबिनची 30 टक्के क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. पिकनिहाय पेरणी अशी- भात- पेरणी क्षेत्र हेक्टरमध्ये 1.41 लाख हेक्टर ( 82 टक्के), ज्वारी- 5 हजार हेक्टर- 8 टक्के, बाजरी- 3 टक्के, मक्का 3 हजार 750 हेक्टर ( 12 टक्के) अशी पेरणी झालेली आहे.
चालुकानिहाय पेरणी क्षेत्र व टक्केवारी अशी-
मिरज- 1 हजार 886 हेक्टर- 5.3 टक्के, खानापूर- 2 हजार 867 हेक्टर- 9 टक्के, वाळवा- 1.55 लाख हेक्टर- 48.2 टक्के, तासगाव- 456 हेक्टर- 1.3 टक्के, शिराळा- 21 हजार 965 हेक्टर- 80 टक्के, कवठेमहांकाळ- 2 हजार 388 हेक्टर- 10.6 टक्के, पलूस-598 हेक्टर- 5 टक्के, कडेगाव- 8 हजार 300 हेक्टर- 33 टक्के, अशी पेरणी झालेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.