पश्चिम महाराष्ट्र

जलसंकट टाळण्यासाठी प्रयत्नांची गरज - राजेंद्रसिंह राणा 

सकाळवृत्तसेवा

सांगली - दिवसेंदिवस लोकसंख्येच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र त्या प्रमाणात पाणीसाठे वाढत नाहीत. अद्यापही मला काय त्याचे ही वृत्ती अनेकांच्या मनात आहे. भविष्यात पाणीसंकट टाळायचे असेल तर सर्वांनीच पुढाकार घेऊन देश पाणीदार बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केले.

विलिंग्डन महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. महाविद्यालयाच्या वेलणकर सभागृहात जलसंवर्धन या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्राचार्य भास्कर ताम्हनकर, किशोर पंडित विलास चौथाई आदी उपस्थित होते.

राजेंद्रसिंह राणा म्हणाले, पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहचवता आपण विधायक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश करणे योग्य नाही. राजस्थान येथे जनसहभागाच्या मदतीने आम्ही हजारो जोहड म्हणजेच कच्चे तलाव, बांध निर्माण केले. यामुळे पावसाचे पाणी त्यात सामावले गेले. परिणामी परिसरातील दिड लाखहून अधिक विहिंरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत जाणार आहे. परंतु आपण मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी धर्म आणि जातीच्या राजकारणात गुंतून पडत आहोत. समाजात विभागणी होत आहे. सर्व काही शासन करेल ही वृत्ती चुकीची आहे. समाज सुधारावा असे वाटत असेल तर त्याची सुरवात आपल्यापासून केली पाहिजे. लोकसहभागातून राजस्थानातील बारा मृत नदींना आम्ही जीवंत केले आहे. आज त्याचा लाभ ग्रामस्थांनाच होत आहे.

- राजेंद्रसिंह राणा

ग्लोबल वॉर्मिंगमध्येही वाढ होत चालली आहे. सध्या विकासाच्या नावाखाली जे काही प्रकल्प येत आहेत त्याच्या माध्यमातून खरेच विकास होतो की पर्यावरणाची हानी यावर प्रत्येकाने शांतपणे विचार करणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातही आपण पाण्याचा गैरवापर करण्यात आघाडीवर असतो. तो कोणत्याही परिस्थितीत रोखला पाहिजे. पाणी नियोजनाचे महत्व प्रत्येकाने समजून त्यानुसारच वाटचाल करावी असे आवाहनही त्यांनी केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT