Raju Shetty accuses the government 
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टींचा घरचा आहेर ः महाविकास आघाडी म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ 

सकाळ वृत्तसेवा

राहाता : ""पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणूक आणि कार्पोरेट विमा कंपन्यांचे कल्याण करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी बिनकामाची आणि तकलादू आहे.

भाजप आणि महाविकास आघाडी हे दोघेही शेतकऱ्यांसाठी काही करीत नाहीत. किमान महाविकास आघाडी धार्मिक भेदभाव वगैरे करीत नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने ही आघाडी म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ आहे,'' अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. 


शेतकरी संघटनेच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज येथे झाली. त्याआधी शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप रोहोम यांनी त्यांचे स्वागत केले. "स्वाभिमानी'चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोफळे, विठ्ठल शेळके, अंबादास कोरडे, संतोष रोहोम आदी उपस्थित होते. 


शेट्टी म्हणाले, ""पीकविमा कंपन्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून लूटमार करतात. त्यांच्या विरोधात सर्व स्तरावर आम्ही पुराव्यानिशी तक्रारी केल्या. काहीही उपयोग झाला नाही. गेल्या तीन-चार वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याऐवजी विमा कंपन्या मालामाल झाल्या, हे दुर्दैव आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत यासाठी आम्ही त्यांच्यासोबत गेलो; मात्र त्यांच्या कर्जमाफीने शेतकऱ्यांची पुरती निराशा केली.'' 


शेतकऱ्यांची व्होट बॅंक व दबाव गट तयार होत नाही. शेतकरी हा शेतकरी म्हणून मतदान करीत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे शेती राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर येत नाही. अशा परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांचे संघटन करून सरकारवर दबाव आणतो.

विरोधात असलेला पक्ष नेहमी शेतकरीहिताच्या गप्पा मारतो. सत्तेत गेला की पायउतार झालेला पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने बोलू लागतो. सत्ताधारी पक्षावर शेतकऱ्यांचा दबाव राहत नाही, तोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत. त्यासाठी आमची धडपड सुरू असते, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

 शाळा बंद करण्यास विरोध 
देशातील तेल कंपन्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ब्राझीलसोबत स्वस्त इथेनॉल खरेदीचा करार करण्याच्या तयारीत असल्याचे कळते. तसे झाले तर देशातील साखर उद्योग आणि ऊसउत्पादक अडचणीत सापडतील. आम्ही या करारास विरोध करू. वाड्या-वस्त्यांवरील कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर त्यालाही जोरदार विरोध करू. या निर्णयामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या मुला-मुलींना शिक्षणाची दारे बंद होतील, अशी भीती शेट्टी यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT