raju sheety.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टी यांनीच आमदारकी स्विकारावी... यासाठी राज्यभर मोहिम राबवण्याचा 'यांनी' घेतला निर्णय....

सकाळवृत्तसेवा
सांगली - राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेची आमदारकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना देण्याची तयारी महाविकास आघाडीने दर्शवली आहे.संघटनेतील अंतर्गत वादातून ती आमदारकी सोडण्याची भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. मात्र शेतकरी हित आणि संघटनेचे हित त्यांनी आमदार होण्यामुळे साधणार आहे. त्यामुळे त्यांनीच आमदार व्हावे,अशी भूमिका सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी घेतली आहे. त्यासाठी सांगली जिल्ह्याच्या वतीने राज्यव्यापी माहिम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 

खराडे म्हणाले, हातकणंगले लोकसभा मतदार संघ निवडणुकीत श्री. शेट्टी यांचा पराभव झाला. यामुळे संघटनेला मरगळ आली. त्याच्याकडे सद्या कोणतेही पद नाही अशा परिस्थितीत संघटनेच्या नेत्याकडे आमदारकी असली तर प्रशासन आणि अन्य कामांसाठी ते संघटनेच्या हिताचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य पातळीवर मांडण्यासाठी आमदारकी महत्वाची ठरणार आहे. 

आमदारकी न मिळाल्याने सावकार मधणाईक, प्रा. जालिंदर पाटील आदींनी नाराजीचा सूर काढला आहे ही वस्तुस्थिती आहे. दोघांचेही योगदान चांगले आहे, दोघांनीही संघटनेसाठी त्याग केला आहे. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करणे गैर नाही. मात्र आता ही वेळ नाही कारण ही राज्यपाल कोट्यातून आमदारकी आहे. त्यासाठी राज्यव्यापी काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करणे गरजेचे आहे, असे राज्यव्यापी व्यक्तिमत्व राजू शेट्टी हेच आहेत. त्यांनी ऊस, दूध, आदीसह अन्य प्रश्नावर राज्यव्यापी आंदोलने करुन कृषी आणि शेतीतील जाणकार अभ्यासक म्हणून राज्याला ते परिचित आहेत. त्यामुळे संघटनेतील अन्य कुणाच्या नावाची शिफारस केली तरी राज्यपालांकडून त्या नावाला समती मिळणे दुरापास्त आहे. या पार्श्‍वभूमिवर हाताला आलेली संधी दूर लोटणे संघटनेच्या दृष्टीने पायावर दगड मारून घेतल्यासारखे होईल. शेट्टी यांनी संधी नाकारली तर एका आमदारकीला मुकावे लागेल. ते शेतकरी आणि संघटनेच्या दृष्टीने हानिकारक होईल म्हणुनच. आम्ही सांगली जिल्ह्याच्या वतीने राज्यभर राजू शेट्टी यांनीच आमदारकी स्विकारावी यासाठी मोहीम राबवणार आहोत. राज्यातील तमाम शेतकरी व कार्यकर्त्याची हीच इच्छा आहे. त्याच्या वर प्रेमाचा दबाव टाकून आमदारकी स्वीकारायला भाग पाडू. सावकार मदनाईक आणि प्रा. जालिंदर पाटील याची नाराजी दूर करण्यात राज्यातील सर्व कार्यकर्त्यांना यश येईल यात शंका नाही. संघटनेतील संघटनेतील वादळ शमेल असा आशा आहे. पूर्वीही संघटनेत असे वादविवाद झाले आहेत. मात्र शेवटी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवूनच वाटचाल करायला हवी, याची जाणीव नाराज ठेवतील याची आम्हाला आशा आहे. 


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi on VB-G-RAM-G: ''सरकारने ‘मनरेगा’वर बुलडोझर फिरवला'' ; नाव बदलावरून सोनिया गांधींची जोरादार टीका!

Mumbai: भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक घटना, कारण काय?

ASHA MOVIE REVIEW: विषय, कथा, मांडणी सुंदर पण प्रेक्षकांना भावेल का? कसा आहे रिंकू राजगुरूचा 'आशा' चित्रपट?

Latest Marathi News Live Update : धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास शंभर महिला नजर कैदेत

BMC Election: महापालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज! मनाई आदेशांसह विशेष पथके तैनात; गुन्ह्यांवरही कडक नजर

SCROLL FOR NEXT