Read Dying ceremony this village
Read Dying ceremony this village 
पश्चिम महाराष्ट्र

वाचा : या गावात होतो मरणाचा सोहळा 

श्रीकांत मेलगे

मरवडे (सोलापूर) : मनुष्य जन्मानंतर जन्मसोहळा आनंदाने साजरा होतो; परंतु मरणानंतरही मरणाचा सोहळा मोजक्‍या लोकांच्याच नशिबी असतो. मृत्यूनंतर फार थोड्या कालावधीतच मृतक व्यक्तींच्या आठवणी पुसल्या जातात. या आठवणी वर्षोनुवर्षे जिवंत राहाव्यात म्हणून मरवडे (ता. मंगळवेढा) येथील ग्रामस्थांनी मृतकाच्या नावे वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरण रक्षणासाठी हे पाऊल उचलले जात असताना आता सर्वसामान्यांच्याही मरणाचा सोहळा साजरा केला जात आहे. 

जीवनाचा प्रवासात यश-अपयश 
प्रत्येकजण आपले आयुष्य सार्थकी लागावे म्हणून जीवनाचा प्रवास करत असतो. जीवनाचा प्रवास करत असताना यश-अपयश या दोन्ही गोष्टींला सामोरे जावे लागते. जगताना कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं; परंतु मरणानंतर काय हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. कुणी आपल्या मरणाचा सोहळा व्हावा, मरणानंतरही कुटुंब व समाजाने आठवण काढावी असे कार्य करीत आयुष्यभर झटत असतो, तर कुणाला आपले कौटुंबिक प्रश्‍न सोडवण्यासाठी उभी हयात घालवावी लागते. दुसऱ्यासाठी आयुष्यभर जगणारा माणूस मात्र मरणानंतर थोड्या कालावधीत विस्मरणात जातो. 

पर्यावरणाच्या रक्षणासाठी संकल्पना 
मरणानंतरही सर्वांच्याच आठवणी सदोदित राहाव्यात व पर्यावरणाच्या रक्षणासाठी मरवडे येथील श्री समर्थ बैठक परिवाराच्या संकल्पनेतून गावातील मृतकाच्या नावे झाड लावून त्याचे संवर्धन करण्याच्या उपक्रमास नुकताच प्रारंभ करण्यात आला. मरवडे गावातील मृतक व्यक्तीच्या तिसऱ्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मृतकाच्या नावे झाड

मृतकाच्या नावे झाड लावल्यानंतर ग्रामस्थांबरोबर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यही मासिक, वर्षश्राद्ध व विधी निमित्ताने त्या वृक्षाच्या संगोपनासाठी प्रयत्न करतील. नुकतेच दामाजी फलोत्पादन संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल दगडू जाधव यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने स्मशानभूमीत झाड लावण्यात आले. या वेळी स्मशानभूमीतील संपूर्ण परिसराची स्वच्छताही करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT