Release 5 TMC water to Karnataka Siddaramaiah letter to Chief Minister Eknath Shinde belgaum  sakal
पश्चिम महाराष्ट्र

CM Siddaramaiah : कर्नाटकाला ५ टीएमसी पाणी सोडवे ; सिद्धरामय्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

जलाशयातील पाणी पातळी घटल्यानंतर कर्नाटक दरवर्षी महाराष्ट्राकडून पाणी घेते

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाच टीएमसी पाणी सोडण्याची विनंती आज (ता. ३१) पत्राद्वारे केली आहे. जलाशयातील पाणी पातळी घटल्यानंतर कर्नाटक दरवर्षी महाराष्ट्राकडून पाणी घेते. त्याचप्रमाणे यंदाही पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र पाठवत पाच टीएमसी पाणी पुरवठा करण्याबाबत विनंती केली आहे.

या पत्रामध्ये म्हटले आहे की, ‘‘बेळगाव व गुलबर्गासह उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांत पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती आहे. तसेच जनावरांना पाण्याची टंचाई भासत आहे. त्यासाठी कृष्णा आणि भीमा नदी पात्रात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे’’ महाराष्ट्र शासनाकडे भीमा आणि कृष्णा नदीला यापूर्वी तीन टीएमसी पाणी सोडण्याबाबत विनंती करण्यात आली होती.

त्याची दखल घेऊन महाराष्ट्राने मे महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये एक टीएमसी पाणी सोडले आहे. त्याबद्दल सिद्धरामय्या यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण, यंदा उन्हाळा अधिक तीव्र झाला असून, जलाशयांची पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे पाणी टंचाई तीव्र झाली असल्याने पाच टीएमसी पाण्याची मागणी केली आहे.

बेळगावसह उत्तर कर्नाटकाला पिण्यासाठी दोन टीएमसी पाणी वारणा व कोयना जलाशयामधून सोडले जावे. तसेच महाराष्ट्रातील उजनी जलाशयातून तीन टीएमसी पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या जाव्यात. पाच टीएमसी पाणी जून महिन्यामध्ये सोडण्यात यावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT