The roads are shiny; But the lack of facilities in Sangali  
पश्चिम महाराष्ट्र

रस्ते होताहेत चकाचक; पण सुविधांची वानवा,.. कुठे वाचा

सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिका क्षेत्रातील दुर्लक्षित उपनगरे मुलभूत सेवा-सुविधांपासून कोसो मैल दूर असली तरी रस्त्यांबाबत सुखी आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले रस्ते मार्गी लागले आहेत. त्यामुळे नागरिकांची सोय होत आहेच; शिवाय दळणवळणाच्या सोयीही वाढल्या आहेत. वृंदावन व्हिलाज, धामणी रोड परिसरातील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. कुंभार मळा परिसरात या रस्त्याचे काम वेगाने सुरु लागल्याने सांगली-मिरज अंतरही आता मिटणार आहे. 

शहरातील दुर्लक्षित उपनगरात रस्त्यापासून ते ड्रेनेजपर्यंतचे प्रश्‍न कित्येक वर्षे रखडले आहेत. नागरिकांनी रस्त्यांबाबत अनेक वर्षांपासून मागणी करुनही रस्ते होत होते. गत पाच वर्षात मात्र या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याचे चित्र आहे. मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरणामुळे रस्त्यांनी कात टाकली आहे. आमदार फंडासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, जिल्हा परिषद निधीतून होणारे रस्ते दर्जेदार तसेच प्रशस्त बनत आहेत. सांगलीतील बहुतांश उपनगरात आज रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. काही कामे प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीत अडकली आहेत. 

पावसाळ्यात रस्त्याअभावी लोकांची होणारी गैरसोय ध्यानात घेत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने कामे मार्गी लावण्यावर भर दिला आहे. प्रामुख्याने शामरावनगर, संजयनगर, अभयनगर, कारखाना परिसर, धामणी रस्ता, विश्रामबाग, विजयनगर परिसरातील चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक पावसाळ्यात त्रस्त बनले होते. चिखल, पाण्यातून वाट काढताना नागरिकांची पुरेवाट होत होती. मोकळ्या प्लॉटवरील पाणी रस्त्यावर साचल्याने त्यातून मार्गक्रमण करताना नरकयातनांचा अनुभव येत होता. पाणी निचऱ्याची कोणतीही सोय नसल्याने ड्रेनज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सर्रास चित्र होते. एकट्या शामरावनगरात सुमारे 10 हजार नागरिकांना चिखलमय रस्त्यातून ये-जा करावी लागत होती. ती परिस्थिती आता राहिली नाही. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांचेही आता डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी होणारा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे. 

सांगली-मिरज अंतर 7 किमी 
विजयनगर जिल्हा न्यायालय परिसरातील हसनी आश्रम, कुंभार मळा, स्फूर्ती चौकातून दक्षिणेकडे जाणारा रस्ता शामरावनगरातील खिलारे मंगल कार्यालयासमोरुन कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीपर्यंत होणार आहे. मिरजेतील समतानगर परिसरापर्यंत हा रस्ता असल्यामुळे सांगली-मिरज हे अंतर अवघ्या सात किलोमीटरवर येणार आहे. वृंदावन व्हिला परिसरात हे काम गतीने सुरु आहे. सांगलीसह, कुपवाड, मिरजेतील नागरिकांना कोल्हापूरकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग ठरेल. तसेच मुख्य रस्त्यावर येणारा वाहतुकीचा ताणही काहीअंशी कमी होणार आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT