पश्चिम महाराष्ट्र

उत्तूरमधील चोरीला गेलेल्या पाच लाखांचा छडा

सकाळ वृत्तसेवा

उत्तूर - येथील एका हॉटेलमध्ये नाष्ट्यासाठी थांबलेल्या व्यापाऱ्याची पाच लाख २२ हजार ५०० रुपये असलेली बॅग लंपास झाली होती.  आजरा पोलिसांनी तातडीने तपास करून चार तासांत चोरीचा छडा लावला.  या प्रकरणी हॉटेलमालकासह अभियंत्याला अटक झाली आहे. रविवारी (ता. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास उत्तूर बसस्थानकावर ही घटना घडली होती. याबाबत राजेंद्र शिवाजी मगदूम (वय ३१, बुद्धिहाळ, ता. चिक्‍कोडी, बेळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी; मगदूम फुलाचे व्यापारी आहेत. गोवा येथून फुलाच्या विक्रीचे पैसे वसूल करून ते आंबोली-आजरा-उत्तूरमार्गे चिक्‍कोडीकडे मोटारीतून जात होते. उत्तूरमध्ये आल्यावर ते ऑलविन चायनीज सेंटर या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी थांबले. या वेळी त्यांचा भाऊ मधुकर बाळू मगदूमही सोबत होता. मगदूम यांनी पैशांची बॅग जवळील खुर्चीवर ठेवली होती. नाष्टा करून झाल्यावर दोघे काँटरवर पैसे देण्यासाठी गेले. पैसे देऊन पुन्हा परत आल्यावर त्यांना बॅंग चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत हॉटेलचालक व आजूबाजूला चौकशी केली असता बॅग सापडली नाही. बॅग गेल्याने एकच खळबळ उडाली.   

दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सत्यजित घुले, सहायक फौजदार पांडुरंग दोरुगडे, पोलिस नाईक सतीश वर्णे यांनी तपासाला सुरवात केली. या वेळी हॉटेलमालक विकी फ्रान्सिस कुडतात यांनी ही बॅग प्रसाद बाळकृष्ण गुरव यांच्याकडे दिल्याचे पुढे आले. प्रसादने ती बॅग जखेवाडी रस्त्याकडेला शेतात लपवून ठेवली होती. पोलिसी खाक्‍या दाखविताच त्याने बॅग पोलिसांच्या हवाली केली.

कुटुंबाला धक्का
दरम्यान, यातील आरोपी प्रसाद अभियंता आहे. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत झाले आहेत. सुशिक्षित घराण्यातील या युवकाचे प्रताप पाहून गुरव कुटुंबाला डोक्‍याला हात लावायची वेळ आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT