Sambhaji Bhide addressing the crowd during the Durga Mata Run in Sangli, where he made controversial remarks about Hindu festivals. esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Bhide: "गणपती-नवरात्र उत्सवाचा चोथा झाला, हिंदू समाजाला XXX...";  संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

Sambhaji Bhide Criticizes Modern Celebration of Ganpati and Navratri: संभाजी भिडेंच्या या विधानांनी पुन्हा एकदा समाजात चर्चा रंगली आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी त्यांच्या विधानांना विरोध दर्शवला आहे. त्यांचे विचार आणि भाषणांवर अनेकदा टीका केली जाते, परंतु त्यांच्या अनुयायांमध्ये मात्र त्यांना पाठिंबा मिळतो.

Sandip Kapde

सांगली: संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. सांगली येथे आयोजित दुर्गामाता दौडी दरम्यान ते बोलत होते. गणपती आणि नवरात्र उत्सव सध्या इव्हेंट्समध्ये बदलले असून, हिंदू समाजाची दिशा बिघडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. "गणपती उत्सवाचा चोथा झाला असून, नवरात्र उत्सवात होणाऱ्या दांडियामुळे हिंदू समाजाला गोंधळात टाकले जात आहे," असे ते म्हणाले.

"नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ होऊ देणार नाही"

संभाजी भिडे यांनी नवरात्र उत्सवात मनोरंजनाचे कार्यक्रम होत असल्याचे निदर्शनास आणले आणि हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची गरज व्यक्त केली. "नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्याचबरोबर काही माता-भगिनींनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. "नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत, जे उत्सवाची शुद्धता आणि परंपरा नाश करत आहेत," अशी त्यांची भूमिका होती.

"हिंदू समाज  XXX  बनवला जातोय"

भिडे यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजावर गंभीर टीका केली. "शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप बनण्याचा मार्ग शिकवला, पण आज गणपती आणि नवरात्र उत्सवात आम्ही समाजाला गोंधळात टाकतोय," असे ते म्हणाले. "हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदी चिनी भाई भाई यांसारखी विचारसरणी समाजाला दिशाहीन करत आहे," अशी त्यांनी टीका केली. याचबरोबर त्यांनी पंतप्रधानांवरही निशाणा साधला, "हिंदी चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान हे आपल्यासाठी दुर्दैव आहे," असे ते म्हणाले.

"राजकारण आणि अर्थकारण थुंकण्याच्या लायकीचे"

भिडे यांनी राजकारण, सत्ताकारण आणि अर्थकारणावरही कडवट टीका केली. "हे सर्व शूद्र आहेत, हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत," असे त्यांनी सांगितले. त्याऐवजी शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करून समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान राखून समाजाने प्रगती करावी, अशी त्यांनी सूचना केली.

समाजाच्या मनात संभ्रम

संभाजी भिडेंच्या या विधानांनी पुन्हा एकदा समाजात चर्चा रंगली आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी त्यांच्या विधानांना विरोध दर्शवला आहे. त्यांचे विचार आणि भाषणांवर अनेकदा टीका केली जाते, परंतु त्यांच्या अनुयायांमध्ये मात्र त्यांना पाठिंबा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT