Sambhajiraje statement Swarajya organization become political party sangli Sakal
पश्चिम महाराष्ट्र

‘स्वराज्य’चा राजकीय पक्ष शक्य : संभाजीराजे

ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त संभाजीराजे यांनी मंगळवारी तुळजाभवानी मातेचे दश॔न घेतले. त्यानंतर ‘स्वराज्य’ संघटनेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण झाले

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर : भविष्यात स्वराज्य संघटना राजकीय पक्ष होऊ शकतो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी आज येथे सांगितले. ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त संभाजीराजे यांनी मंगळवारी तुळजाभवानी मातेचे दश॔न घेतले. त्यानंतर ‘स्वराज्य’ संघटनेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण झाले. याप्रसंगी झालेल्या सभेत ते बोलत होते. संभाजीराजे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांप्रमाणे राष्‍ट्राचा विकास करायचा आहे, परिवर्तन घडवायचे आहे. काही चुकीचे घडत असेल तर स्वराज्य संघटना गप्प बसणार नाही. माफही करणार नाही.

डिवचले तर अंगावर घेऊ शकतो. ‘स्वराज्य’ची पंचसूत्री महत्त्वाची असून त्यानुसार संघटना वाटचाल करेल.’ छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्थापितांना डावलून विस्थापितांना न्याय दिला. शेती करणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात तलवार दिली. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिले. मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळायले हवे. गेल्या वीस वर्षांपासून कोल्हापूरच्या राजवाड्यात मी पाच दिवसही राहत नाही. आगामी काळात दुग॔म भागातही दौरे करणार आहे, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

आता तो विषय बंद

गाभारा प्रवेशाबाबतही संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘यापूर्वी मला तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला नव्हता. त्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. आता हा विषय माझ्यासाठी संपला आहे. ३५० वर्षांपासून पहिला अभिषेक, पहिला नैवेद्य आणि पहिले फुल करवीर संस्थानकडून दिले जाते. मी मोठा नाही, तर छत्रपतींचे घराणे मोठे आहे,’ असे संभाजीराजे म्हणाले.

शेतकऱ्यांना भरीव मदत द्या

राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपोटी हेक्टरी ७५ हजार रूपये द्यावेत, मराठवाड्यातील शेतीसाठी पुरेसे पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी संभाजीराजेंनी यावेळी केली.

मराठवाड्याला पाणी मिळावे

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्याला मिळाले पाहिजे. या भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे. हे पाणी मराठवाड्याकडे आणताना अनेक तांत्रिक अडचणी येतील. मात्र, त्यावर मात करता येईल.’

तुळजा भवानीमाता ही छत्रपतींची आणि राज्याची कुलस्वामिनी आहे. श्रींची इच्छा असे आपण मानतो. त्याचप्रमाणे तुळजा भवानीमातेसमोर स्वराज्य संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरण केले आहे.

- संभाजीराजे छ्त्रपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईतील रेल्वेट्रॅक पाण्याखाली, पावसाने शहर ठप्प! घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा...

'मला त्याचा 'तो' भाग खूप आवडतो' अभिनेत्रीला नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टबद्दल कमेंट करणं पडलं महागात, नेटकरी म्हणाले, 'हेच का संस्कार'

Mumbai : शिकायला लंडनला जायचं होतं, त्याआधीच बिझनेसमनच्या १७ वर्षीय लेकीनं संपवलं आयुष्य; २३ मजली इमारतीवरून मारली उडी

Rule 72 Explained: तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट होणार? Rule No. 72 सांगतोय तुमचं आर्थिक भविष्य

Dahi Handi 2025 Celebration: गो गो गोविंदा...! दहीहंडी उत्साहात साजरी करण्यासाठी 'या' सेफ्टी टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT