सांगली जिल्ह्यात ६२ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही
सांगली जिल्ह्यात ६२ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही  Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : सांगली जिल्ह्यात ६२ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही

बलराज पवार

Sangli News : जिल्ह्याच्या निर्मितीला ६२ वर्षे झाली, तरी अद्याप जिल्ह्यात ६२ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही, तर ६३४ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत असली, तरी यातील बऱ्याचशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे.

जिल्ह्यातील ६३४ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत आहे, तर ६२ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी निधी दिला जातो. जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायतींच्या स्वतःच्या इमारती आहेत.

मात्र, त्यातीलही २८ इमारती अपूर्णावस्थेत आहेत. त्यांची कामेही रेंगाळली आहेत, तर निर्लेखनासाठी दोन इमारतींचे प्रस्ताव पाठवले आहेत. ग्रामपंचायत हा पंचायतराज व्यवस्थेतील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.

त्यामुळेच शासन आता वित्त आयोगाचे पैसे थेट ग्रामपंचायतींना देत आहे. त्यातून गावची विकासकामे केली जात आहेत. मात्र ग्रामपंचायतींना अजूनही इमारतीसाठी तिष्ठावे लागत आहे.

जत तालुक्यात २३ ग्रामपंचायतींना इमारत नाही

जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असलेल्या जत तालुक्यात सर्वाधिक २३ ग्रामपंचायती स्वतःच्या इमारतीविना आहेत. यामध्ये वळसंग, काराजनगी, कुडणूर, जालिहाळ, अंकलगी, बालगाव अशा काही महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

त्याखालोखाल शिराळा, वाळवा तालुक्यात प्रत्येकी आठ ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही. आटपाडी, कवठेमहांकाळ आणि कडेगाव या तीन तालुक्यांत स्वतःची इमारत असणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अधिक आहे.

बुधगावला सर्वांत जुनी ग्रामपंचायत इमारतः

सांगली जिल्ह्याची निर्मिती एक मे १९६२ मध्ये झाली असली, तरी तत्पूर्वी दक्षिण सातारा जिल्हा होता. आज जिल्ह्यात ६९६ ग्रामपंचायती असल्या, तरी अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती या सांगली जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वीच्या आहेत. प्रशासनाकडील नोंदीनुसार मिरज तालुक्यातील बुधगाव ग्रामपंचायतीचे कार्यालय सर्वांत जुने आहे. संस्थानकालीन दगडी इमारतीमध्ये हे कार्यालय असून ती १९३५ ची आहे. मालगाव ग्रामपंचायतीची इमारत १९४७ ची आहे.

लोकवर्गणी, स्वनिधीतून इमारती

जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या इमारती या लोकवर्गणी, तसेच स्वनिधीतून उभारण्यात आल्या आहेत. यातील बऱ्यापैकी इमारती या जुन्या झाल्या असून त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची आवश्‍यकता आहे.

याशिवाय जिल्हा परिषद निधी, जिल्हा ग्रामीण निधी, स्थानिक विकास निधी, राजीव गांधी पंचायत सक्षमीकरण निधीतून इमारती उभारल्या आहेत. आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून सोळा इमारती बांधण्यास मंजुरी मिळाली आहे.

स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष

जिल्ह्यात १९९० पूर्वी उभारण्यात आलेल्या ५० इमारती आहेत, तर १९७६ पूर्वी उभारण्यात आलेल्या तीस इमारती आहेत. त्यामुळे या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची आवश्‍यकता आहे. या इमारतींचे आयुष्य ३५ ते ५० वर्षांहून अधिक असल्याने ग्रामपंचायत विभागाने त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्‍यकता आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून कामे सुरू आहेत. सर्व ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत असावी, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, ज्या ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम जुने आहे, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

- तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली

एरंडोली येथील ग्रामपंचायत इमारत जुनी झाली असून सध्या गळती लागली आहे याबाबत जिल्हा परिषदेने तात्काळ निर्लेखन करून नवीन इमारतीसाठी जादाचा निधी द्यावा.

- सौ वासंती धेंडे, सरपंच , ग्रामपंचायत एरंडोली

तालुकानिहाय ग्रामपंचायत इमारती ः

तालुका - ग्रा. पं. संख्या -इमारत आहे -इमारत नाही

तासगाव- ६८ -६४- ४

कवठेमहांकाळ -५९- ५७- २

आटपाडी -५४- ५१ -३

कडेगाव -५४ -५२- २

जत -११६- ९३- २३

पलूस -३३- ३१- २

मिरज -६४ -६० -४

शिराळा -९० -८२ -८

खानापूर- ६४-५८ -६

वाळवा -९४ -८६ -८

एकूण -६९६- ६३४ -६२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT