IMG-20200604-WA0049.jpg
IMG-20200604-WA0049.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात गारपीटीने 790 शेतकऱ्यांचे वाचा एवढे झाले नुकसान 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः जिल्ह्यात गारपीट आणि पावसाने शेतीचे गेल्या पाच दिवसात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तासगाव, खानापूर व मिरज तालुक्‍यातील द्राक्ष शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 790 शेतकऱ्यांचे 265 एकरातील द्राक्ष, 10 हेक्‍टरमधील भाजीपाला, 25 हेक्‍टरमधील ऊसाचा समावेश आहे. या शिवाय आंबा व फुल शेतीचेही नुकसान झाले आहे. नुकसानीचे क्षेत्र वाढत असल्यामुळे आणखी दोन दिवस पंचनाम्यासाठी लागतील, अशी माहिती देण्यात आली. 

जिल्ह्यात रविवारी जोरदार गारपीट झाली. त्यानंतर दोन दिवस निसर्ग चक्री वादळाच वादळी पाऊस झाला. या पावसामुळे 265 हेक्‍टरवरील द्राक्ष, 10 हेक्‍टरवरील भाजीपाला, 25 हेक्‍टरमधील ऊस आणि एक हेक्‍टरवरील आंबा पिकांचा समावेश आहे. पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यात द्राक्षच्या पिकलेल्या काडांची पाने गळून पडली आहे. भविष्यात ही काडी पक्क न झाल्याने मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागणार आहे.

शुक्रवारी ( ता. 5) आणि शनिवारी ( ता. 6) जिल्ह्यात हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. कृषी विभागाकडून पंचनामे गतीने सुरु आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आज काही ठिकाणी हलका पाऊस झाला. जिल्हा कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कृषी सहाय्यक, तलाठ्यांकडून पिकांचे पंचनामे सुरु केले असून दोन दिवसात पंचनामे अंतिम होतील, असे सांगण्यात येत आहे. 

 
तालुकानिहाय... 
शेतकरी नुकसान संख्या- मिरज- 205, जत-60, विटा-190, तासगाव- 335. 
द्राक्ष नुकसान ( क्षेत्र हेक्‍टर)- मिरज- 52, जत-20, विटा-43, तासगाव- 150 
 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT