पश्चिम महाराष्ट्र

पांडुरंगाने मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद द्यावा - जयंत पाटील

सकाळवृत्तसेवा

सांगली - मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्‍वासने दिली; मात्र त्यांची पूर्तता झालेली नाही. मराठा समाजाच्या आरक्षणावरून मोठा असंतोष आहे. त्याची प्रतिक्रिया उमटण्याची शक्‍यता असल्यानेच मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या पूजेला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आता विविध समस्यांवर मात करण्यासाठी पांडुरंगाने त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना वारकऱ्यांच्या माध्यमातून करणे आपल्या हातात आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी लगावला. सांगलीत ते पत्रकारांशी बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले, ‘‘आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पूजेसाठी जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे आता विविध समाजांतील समस्यांवर मात करण्यासाठी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा, अशी प्रार्थना वारकऱ्यांच्या माध्यमातून करणे आपल्या हातात आहे. मुख्यमंत्र्यांनी तेथे जाणे आवश्‍यक होते, मात्र सरकारने मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत या समाजांना दिलेल्या आश्‍वासनांना हरताळ फासला आहे. त्यामुळे राज्य सरकारबद्दल या समाजांमधून असंतोष व्यक्त होत आहे. मराठा समाजाचे आरक्षण लांबणीवर कसे पडेल, याचे षड्‌यंत्र काहीजण करत आहेत. त्याला सत्तेत बसलेले लोक खतपाणी घालत आहेत. असा समज झाल्याने समाजात असंतोष आहे. त्याची प्रतिक्रिया उमटण्याच्या शक्‍यतेने मुख्यमंत्र्यांनी शासकीय पूजेला जाणे टाळले.  यामुळे पंढरीला जाऊन मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला पूजा करण्याची वर्षानुवर्षांची परंपरा खंडित झाल्याचा आरोप त्यांनी केला.’’

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या पूजेला जाऊ शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. राज्यासाठी साकडे घालण्याची प्रथा यामुळे खंडित झाली आहे. राज्यात गेल्या चार वर्षांत सामाजिक तणाव निर्माण झाला आहे. मराठा, धनगर, मुस्लिम या समाजांना दिलेले आरक्षणाचे आश्‍वासन पाळले गेले नाही. त्यामुळे जनतेचा संयम सुटत चालला आहे. या समाजांना असुरक्षित का वाटू लागले याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT