Sambhaji Bhide, Udyanraje Bhosale 
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंना अटक केल्यास हिंदुत्ववादी गप्प बसणार नाहीत: संभाजी भिडे

सकाळवृत्तसेवा

सांगली - "साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरील खंडणीचे आरोप धादांत खोटे आहेत. राजकीय हेतूने हे केले गेले आहेत. ते संतापजनक आहेत. शिवप्रतिष्ठान हे खपवून घेणार नाही. उदयनराजेंना अटक केल्यास राज्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, हे लक्षात ठेवा,'' असा इशारा आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी दिला. 

खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक होण्याची शक्‍यता आहे. त्यावर श्री. भिडे यांनी प्रतिक्रिया देताना उदयनराजे असे वागणार नाहीत, असे सांगत शासनाला इशारा दिला. 

ते म्हणाले, "उदयनराजेंना अटक करण्याचे पोलिसांचे प्रयत्न संतापजनक आणि अयोग्य आहेत. ते त्वरित थांबवावेत. "छत्रपती' ही व्यक्ती नाही. तो हिंदू राष्ट्र, देशभक्तीने ओथंबलेला अत्यंत पवित्र असा शब्द आहे. त्यांची अटक उभ्या महाराष्ट्राला संताप, चीड आणण्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे. श्री शिवप्रतिष्ठान हे कधीही खपवून घेणार नाही. महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून प्रतिवाद करू.'' 

ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब लक्ष घालावे. उदयनराजेंवर राजकीयदृष्ट्या हे आरोप झालेत. ते असे काही वागतील यावर परमेश्‍वरही विश्‍वास ठेवणार नाही. जर शासनाने अटक केलीच तर ते महापाप ठरेल, ते करू नये; अन्यथा कार्यकर्ते, धारकरी रस्त्यावर उतरतील.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT