पश्चिम महाराष्ट्र

राज्यात हजारो लिटर दूध अतिरिक्त

अजित झळके

सांगली - दूध पावडर आणि बटरनिर्मिती करणाऱ्या बहुतांश कंपन्यांनी गाईच्या दुधाची खरेदी थांबवल्याने राज्यात हजारो लिटर दूध अतिरिक्त होत असल्याची धक्‍कादायक माहिती पुढे आली आहे. परिणामी, ग्रामीण भागातून संकलित झालेले दूध खासगी आणि सहकारी संघांनी स्वीकारण्यास असमर्थता दर्शविण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर खासगी संघांनी प्रतिलिटर दूधदरात चार रुपयांची कपात केली असून, सहकारी संघही कोंडीत सापडले आहेत. 

या प्रश्‍नात सरकारने तत्काळ लक्ष घालावे, या मागणीसाठी राज्यातील दूध उत्पादक कृती समितीची चार नोव्हेंबरला बैठक बोलाविली आहे. या दूध संकटावर राज्य सरकारने तोडगा काढला नाही, तर अतिरिक्त दूध आणि त्याच्याशी निगडित स्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती समितीचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. सुमारे ५० लाख लिटर दूध अतिरिक्‍त होत असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

राज्यात सध्या सुमारे एक कोटी २० लाख लिटर दुधाचे संकलन होते. पैकी केवळ १५ ते २० टक्के दूध म्हशीचे आहे. ८० टक्‍क्‍यांहून अधिक दूध गाईचे आहे. सांगली, कोल्हापूर पट्टा वगळता म्हशीच्या दुधाचे संकलन अन्य ठिकाणी अत्यल्प आहे. या दुधापैकी सुमारे ५० लाख लिटर दूध हे पिशवीबंद करून ग्राहकांपर्यंत पोचवले जाते. ७० लाख लिटर दूध पावडर आणि बटरनिर्मितीसाठी पाठवले जाते. सध्या पावडरचा प्रतिकिलोचा दर १७० ते १८० रुपये आहे. बटर २७० रुपये प्रतिकिलो आहे. हा दर सरासरी १०० रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरातही घसरण झाली आहे.

अशावेळी गाईच्या दुधापासून हे पदार्थ निर्मिती करण्याचा खर्च आणि उत्पन्न यात मोठे अंतर पडत असल्याने कंपन्यांनी हात मागे घेतला आहे. दूध संघांच्या आरोपानुसार, राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी गाईच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली. आधी ते २४ रुपये प्रतिलिटर होते, आता २७ रुपये झाले. तुलनेत विक्रीदरात वाढीला मान्यता दिली नाही. वाढलेल्या दरात सरकारनेही वाटा उचलला नाही. त्यामुळे संघ संकटात सापडल्याचा आरोप आहे. 

खासगी संघांनी यातून मार्ग काढत गाईचे दूध २१ ते २३ रुपये लिटरने घ्यायला सुरवात केली आहे. सहकारी संघांनी तसे केल्यास राज्य सरकार कायदेभंगाची कारवाई करून संघांचे संचालक मंडळ बरखास्त करू शकते, या भीतीपोटी सहकारी संघ दबकून आहेत. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अनुदान द्या, धोरण बदला
‘महानंद’चे अध्यक्ष तथा कृती समिती अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, ‘‘कर्नाटकमध्ये दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकार देते. त्यामुळे लिटरला २५ ते २७ रुपये दर शक्‍य होतो. येथे सरकारने दर वाढवून ठेवला; मात्र आपली जबाबदारी घेतली नाही. एक तर अनुदान द्यावे किंवा दराविषयीचे धोरण बदलावे, एवढाच पर्याय आहे. राज्यात तूर व अन्य डाळी अतिरिक्त झाल्या तर सरकार खरेदी करते, तसे दूध खरेदी करावे; मात्र सरकारचे पावडरनिर्मितीचे बहुतांश प्रकल्प बंद असल्याने तेही शक्‍य नाही. येत्या चार तारखेच्या बैठकीत यावर आम्ही भूमिका ठरवू. सरकारने यात अंग झटकून चालणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT