पश्चिम महाराष्ट्र

अवकाश-संरक्षण क्षेत्रात 'वालचंद' योगदान देईल - अजित गुलाबचंद

सकाळवृत्तसेवा

सांगली - अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात खासगी उद्योजकांना गुंतवणुकीची संधी देण्यात आली आहे. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय पुढच्या काही वर्षांत यात आपले योगदान देऊ शकेल, असा विश्‍वास महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केला. वालचंद महाविद्यालयाची पुढची वाटचाल "एमआयटी'सारखे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विद्यापीठ म्हणून व्हावी, असे आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'शिक्षणात खूप मोठे बदल येत आहेत. जे आपल्याला स्वीकारावे लागतील. एक स्वायत्त संस्था म्हणून कामाची संधी मिळाली आहे. ही स्वायत्तता गुणवत्तेच्या विस्तारासाठी आहे. जागतिक दर्जाचा अभियंता तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आजवरची शिक्षण व्यवस्थेची परंपरा बाजूला ठेवून पुढे जावे लागेल. अमेरिकेसारख्या देशाची प्रगती ही तिथल्या शिक्षण संस्थांतून होणाऱ्या संशोधनावर अवलंबून आहे. त्यानंतर तिथल्या उद्योगांसोबत या संस्था करीत असलेल्या भागीदारीत आहे. आपल्याला हे करण्यास खूप विलंब झाला. आता आणखी उशीर करणे परवडणारे नाही. केंद्र सरकार त्या दिशेने प्रयत्न करीत आहे. अलीकडेच संरक्षण आणि अवकाश क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहे. यात परदेशातून तंत्रज्ञान आयात होईल. आपल्याला यात सतत प्रगतीच करावी लागेल. यासाठीच वालचंदसारख्या महाविद्यालयांना मोकळीक मिळणे गरजेचे आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT