Sangli ZP sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली : सर्वसाधारण प्रभागांत ‘कहीं खुशी, कहीं गम’

राजकीयदृष्ट्या मिरज तालुका संवेदनशील आहे.

राजेश नागरे

सांगली : जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. सगळ्यांचे लक्ष असलेल्या सर्वसाधारण प्रवर्गाच्या आरक्षणात तासगाव आणि वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये खुशी आहे, तर मिरजेतील कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. जतमध्ये सर्वांना समान संधी मिळणार आहे. खानापूर आणि पलूसमध्ये महिलांना संधी मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी बेचाळीस, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८ आणि अनुसूचित जातींसाठी आठ गट आरक्षित झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २७ टक्के जागा आरक्षित झाल्या आहेत, तर प्रत्येक प्रवर्गात निम्म्या जागा महिलांसाठी आरक्षित आहेत.

आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रत्येक तालुक्याचे राजकीय चित्र समोर येत आहे. यामध्ये मिरज, खानापूर, पलूस आणि जत या तालुक्यात निम्म्याहून जास्त जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. या चार तालुक्यांमधून एकूण ३१ जागांमधून २१ महिला सदस्य निवडून येतील.

मिरजेतील कार्यकर्त्यांना धक्का

मिरज तालुक्यात एकूण बारा गट आहेत. त्यातील तब्बल आठ गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. राजकीयदृष्ट्या मिरज तालुका संवेदनशील आहे. तालुक्यात बारापैकी नऊ गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. मात्र त्यातील सात गट महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे मिरज तालुक्यातील कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुक असलेल्या आणि तयारी केलेल्या कार्यकर्त्यांना आता आरक्षित जागेसाठी महिला उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ आली आहे.

वाळवा, तासगावचे कार्यकर्ते खुशीत

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वाळवा आणि तासगाव तालुक्यात मात्र उलट चित्र आहे. दोन्ही तालुक्यांत सर्वसाधारण प्रवर्गातील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. वाळवा तालुक्यात बारापैकी सात गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यात केवळ दोन जागा महिलांना मिळाल्या आहेत. तासगाव तालुक्यातील सातपैकी सहा जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यामध्येही दोन जागा महिलांसाठी आहेत. या दोन्ही तालुक्यांत सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुक कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी तयारी केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये खुशी आहे.

खानापुरात १०० टक्के महिला

खानापूर तालुक्यातील चारही गट महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यातील तीन जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. या तालुक्यातून चारही महिला सदस्य जिल्हा परिषदेत जाणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना आणखी पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. हीच परिस्थिती पलूस तालुक्यात आहे. या तालुक्यात पाचपैकी तीन जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी चार जागा राखीव असल्या तरी त्यामध्ये दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

चार तालुक्यांत ४१ गट

जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी मिरज, वाळवा, जत आणि तासगाव या चार तालुक्यांतील ४१ गट आहेत. त्यामुळे या चार तालुक्यांतून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सगळे पक्ष करतील.

दिग्गजांना करावी लागणार प्रतीक्षा

मिरज, जत, खानापूर, पलूस या तालुक्यांमध्ये महिला सदस्यांना जास्त संधी मिळणार असल्याने अनेक दिग्गजांना पुढची पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. काहीजण पत्नीला संधी देऊन दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न करतील. परंतु त्यांना स्वतःला सभागृहात बसण्याची संधीमिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT