पश्चिम महाराष्ट्र

कृषिपंप वीजबिलाचा ४.९४ कोटी भरणा

सकाळवृत्तसेवा

सातारा - महावितरणच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक ग्राहकांनी या महिन्यात कृषिपंपांचे वीजबिल भरले. ‘महावितरण’कडे चार कोटी ९४ लाख रुपये या बिलापोटी जमा झाले. 

‘महावितरण’च्या प्रवक्‍त्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की ‘‘जिल्ह्यात कृषिपंपांचे बिल भरण्यास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १५ हजार ७८५ शेतकऱ्यांनी या महिन्यात चार कोटी ९४ लाख रुपये कृषिपंपांच्या वीज बिलापोटी भरले आहेत. आता मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सर्व कृषिपंपधारकांनी आपले वीजबिल तातडीने भरून योजनेचा लाभ घ्यावा.’’

‘‘कृषिपंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार जून-२०१७ चे त्रैमासिक चालू वीजबिल भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत ३१ मार्चपर्यंत असलेल्या मूळ थकबाकीचा हप्त्यांनी भरणा केल्यास व्याज व दंड माफ केले जाते.

सातारा जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार ६७७ ग्राहकांकडे १८९ कोटी ९८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील १५२ कोटी ३९ लाख रुपयांची मूळ थकबाकी दिलेल्या हप्त्यांत चालू वीज बिलांसह भरल्यास ३५ कोटी ६९ लाख रुपयांचे व्याज व एक कोटी ९० लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा शासनाचा विचार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''त्यांची लायकी नाही.. त्यांना कशाकशातून बाहेर काढलं, याची यादी वाचली तर फिरणं मुश्कील होईल'' पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

जुगार कंपन्यांकडून भाजपला इलेक्ट्रॉल बॉण्डव्दारे 1400 कोटी; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Jos Buttler IPL 2024 :वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली अन् राजस्थानसह अनेक IPL संघांना बसला मोठा झटका

India Squad for T20 WC: केएल राहुलची टी20 कारकीर्द संपुष्टात? 'या' पाच खेळाडूंचीही संधी हुकली

Arvind Kejriwal: केजरीवालांना निवडणुकीपूर्वीच अटक का केली? सुप्रीम कोर्टानं ईडीकडून मागवलं उत्तर

SCROLL FOR NEXT