raj thackeray 
पश्चिम महाराष्ट्र

जनतेला मुर्खात काढण्याचे दिवस संपलेः राज ठाकरे

सकाळवृत्तसेवा

साताराः जनतेला मूर्खात काढण्याचे दिवस आता संपले असून, येत्या निवडणुकीत भाजपा सरकारचा पराभव अटळ आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे. गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज शेवटचे बजेट जाहीर करत आहेत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (गुरुवार) व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उल्लेख गुजरातचे पंतप्रधान करताना ठाकरे म्हणाले, 'गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटचं बजेट जाहीर करत आहेत. दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळे केले आहे. 30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळाले, ते येण्यासाठी किती थापा मारणार. आजची महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा विचार केला तर शिवाजी महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल, त्याचा विचार करून पाहा. औरंगजेबाला शेवट पर्यंत शिवाजी नावाचा विचार मारता आला नाही. महाराजांचा महाराष्ट्र आज जाती-पाती मध्ये अडकलाय, नुसते पुतळे उभे करून काही होणार नाही. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा हे तुमच्या समोर दाखवलेलं फक्त एक चित्र आहे. तुमची मत मिळवण्यासाठी महाराजांचे खरे स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही ते रतन खात्री कडे कामाला होते का
?'

'गुजरातच्या खोट्या प्रतीमेचा उदोउदो करून संपूर्ण देशाला वेड्यात काढण्याचे काम सध्या सुरू आहे. परदेशातील कोणतीही प्रमुख व्यक्ती देशात आली तर तिला केवळ गुजरातमध्येच नेले जाते. का? आमचा महाराष्ट्र नाही का? केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अन् मध्य प्रदेशसारख्या राज्यात विकास झाला नाही का? आज मांडण्यात आलेला अर्थसंकल्प देशाचा नसून केवळ आगामी निवडणुकीचा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पावर माझा कदापिही विश्वास नाही,' असेही ठाकरे म्हणाले.

ठाकरे पुढे म्हणाले, 'विकासाच्या नाववरती नुसत्या शेतकऱ्यांकडून जमिनी ओरबडल्या जातायत. धर्मा पाटील तडफडतोय आणि मुख्यमंत्र्यांचे अंगावर बर्फ घेतानाचे फोटो येतात. मी सत्य बोलतो. त्याचे परिणाम भोगण्यास मी तयार असतो. मात्र, मी जे बोलतो ते काही वर्षांनंतर तसेच घडते, तेव्हा माझ्या बोलण्याचे महत्त्व जनतेला कळते. मी कळवळून सांगत असतो की, एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मला सत्ता देऊन बघा. मात्र विकासावर निवडणुका जिंकता येत नाहीत, असे वाटू लागले आहे. नाशिकमध्ये मला हा अनुभव आला आहे.'

प्रमुख मुद्देः

  • गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचं शेवटचं बजेट जाहीर करत आहेत.
  • आजची महाराष्ट्राच्या राजकीय परिस्तितीच विचार केला तर महाराजांच्या मनाला किती त्रास होत असेल त्याचा विचार करून पाहा.
  • औरंगजेबाला शेवट पर्यंत शिवाजी नावाचा विचार मारता आला नाही.
  • महाराजांचा महाराष्ट्र आज जाती पाती मध्ये अडकलाय.
  • दळभद्री राजकारण्यांनी या देशाचा वाटोळं केले.
  • नुसते पुतळे उभे करून काही होणार नाही.
  • शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभा करायचा हे तुमच्या समोर दाखवलेलं फक्त एक चित्र आहे तुमची मत मिळवण्यासाठी.
  • महाराजांचे खरे स्मारक हे त्यांचे गडकिल्ले आहेत.
  • आत्ता असेलल केंद्र आणि राज्य सरकार हे नुसतं थापड्यांचे सरकार आहे.नरेंद्र मोदींच्या उल्लेख गुजरातचे पंतप्रधान.
  • 30 वर्षांनी मोदींना बहुमत मिळालं ते येण्यासाठी किती थापा मारणार.
  • देवेंद्र फडणवीस रोज नवीन आकडे काढतायत मला कळत नाही रतन खात्री कडे कामाला होते का?
  • महाराष्ट्रा सारख सुसंस्कृत राज्य तुम्हाला जातीत आणि विभागात वाटायचंय.
  • विकासाच्या नाववरती नुसत्या शेतकऱ्यांकडून जमिनी ओरबडल्या जातायत.
  • धर्म पाटील तडफडतोय आणि मुख्यमंत्र्यांचे अंगावर बर्फ घेतानाचे फोटो येतात.
  • आज करमणूक म्हणून तुम्ही राजठाकरेंच भाषण ऐकत असला तर याच भविष्यात तोटा होईल.
  • राज ठाकरे तुम्हाला भडकवत नाही, आजच्या महाराष्ट्राची सत्य परिस्तिती सांगतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT