ajitdada.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आबांच्या नावाने "स्मार्ट व्हिलेज' पुरस्कार देणार

सकाळवृत्तसेवा

सांगली- आर. आर. आबा पाटील हे लोकांच्या मनातील नेते होते. त्यांचे समाधीस्थळ असलेल्या निर्मलस्थळाची प्रलंबित कामे वर्षभरात पूर्ण केली जातील. त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या "स्मार्ट व्हिलेज' पुरस्काराचे आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार असे नामकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. 


आबांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमीत्त अंजनी (ता. तासगाव) येथील समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, माजी आमदार सदाशिव पाटील, अंजनीच्या सरपंच स्वाती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


श्री. पवार म्हणाले, ""आबा समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे नेते होते. दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या खात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळून त्या खात्यांची उंची वाढविली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यात यशस्वीपणे राबविले. राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या "स्मार्ट व्हिलेज' पुरस्काराचे आर. आर. (आबा) पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार असे नामकरण करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. हे पुरस्कार आबांच्या पुण्यतिथी दिनी वितरीत करण्याचा मानस आहे.'' 


ते पुढे म्हणाले, ""आबांच्या सांगलीतील स्मारक सभागृहाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 8 कोटी 70 लाखांचा निधी यंदाच्या अर्थसंकल्पात उपलब्ध करून दिला जाईल. सांगली जिल्ह्यातील सर्वच विकास कामांना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्‍यातील ज्या गावांना सिंचन योजनेचे पाणी पोहोचलेले नाही त्या गावांत पाणी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमदार सुमनताईनी सुचविलेली सर्व कामे मंजूर केली जातील. त्या कामांना आवश्‍यक असणारा निधी प्राधान्याने दिला जाईल. टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ योजनेच्या कामांना आवश्‍यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी जलसंपदा विभागाला भरघोस निधी दिला जाईल. कृषि कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. 2 लाखांवरील पीक कर्ज व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही निर्णय घेतला जाईल.'' 


पालकमंत्री पाटील म्हणाले, ""आबांनी दुष्काळी भागात पाणी नेऊन शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली. त्यामुळे शेतकरी सुखी आणि समाधानी झाला असल्याचे दिसत आहे. आबांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे. तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्‍यातील ज्या गावांना पाणी पोहोचले नाही त्या गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करू. आबांना अपेक्षित विकास घडविणे हीच त्यांना श्रध्दांजली ठरेल.'' 

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, ""दुष्काळी भागातील आबांनी लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करून खऱ्या अर्थाने ग्राम विकासाचे काम केले आहे. ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव या योजनांमध्ये केलेले काम आदर्शवत आहे.'' 

सहकार मंत्री पाटील म्हणाले, ""आबांचे अंजनी येथील समाधीस्थळ स्फूर्तीस्थळ व्हावे. आबांनी घेतलेल्या निर्णयामुळे या भागाचा विकास झालेला दिसून येत आहे. दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नती झाली आहे.'' 
आमदार अनिल बाबर, अरूण लाड, सुरेश पाटील, अविनाश पाटील, सचिन खरात यांनी आबांच्या स्मृतींना उजाळा दिला. उपस्थित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून आबांना अभिवादन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Census: जनगणनेत जात सांगणं अनिवार्य नाही! देशात पहिल्यांदाच डिजिटल सेन्सस; ११ हजार ७१८ कोटी मंजूर

TAIT Exam 2025: भावी शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी! TAIT परीक्षेतील २,२०७ उमेदवारांचे निकाल रद्द

Pregnancy Prep 2026: पुढच्या वर्षी प्रेग्नेंसी प्लॅन करताय? मग 2025 संपण्याआधीच बदला 'या' ५ महत्त्वाच्या सवयी

Viral Video: देशाच्या पहिल्या डॉनची मुलगी त्रस्त; मोदी आणि शहांकडे न्यायाची मागणी, काय घडलं? पाहा भावनिक व्हिडिओ व्हायरल

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी ३९४६ मतदान केंद्रांची तयारी; प्रत्येक ९०० मतदारांसाठी एक केंद्र

SCROLL FOR NEXT