farmer strike  
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर: दूध, भाजीपाला रस्त्यावर ओतणे सुरूच 

संतोष सिरसट

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संपाचा दुसरा दिवस पहिल्या दिवसाप्रमाणेच सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर दूध व भाजीपाला ओतून सरकारचा निषेध केला आहे. 

सोशल मिडियावर दुधाची व भाजीपाल्याची नासाडी करू नका असा संदेश व्हायरल झाला आहे. त्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक होत आमचेच नुकसान होणार असल्याचे ठणकावून सांगितले आहे. 

राज्यभर कालपासून शेतकऱ्यांचा संप सुरू झाला आहे. त्याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटत आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे. तीच स्थिती संपाच्या दुसऱ्या दिवशीही कायम आहे. जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद आहेत. काही बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेल्या मालाचे लिलाव केले आहेत. जिल्हा दूध संघाने जिल्ह्यातील दुधाचे संकलन बंद केले आहे. 
 
जादा दूध शेजाऱ्याला 
एरव्ही दूध संकलन केंद्रावर जाऊन दुधाची विक्री करणारा शेतकरी कालपासून ते दूध शेजाऱ्याच्या घरी नेऊन देऊ लागला आहे. काहीजण त्या दुधाचा खवा बनवू लागले आहेत. दुधाची नासाडी करण्यापेक्षा ते शेजाऱ्यांना देऊन दूध सत्कारणी लावत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'गॅरी कर्स्टन बनायला आला अन् चॅपेल बनला...' भारताला व्हाईटवॉश मिळाल्यानंतर गंभीर ट्रोल; मीम्सही व्हायरल

"सुकन्याची ऑडिशन पाहून मी.." रेणुका यांनी सांगितली खास आठवण ; म्हणाल्या...

'कंडोम खरेदी करण्यासाठी लोक लाजतात' काजोल आणि सोनाक्षीचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या...'म्हणूनच एवढी लोकसंख्या...'

Latest Marathi News Live Update : दहिसरमध्ये इमारतीला लागली भीषण आग

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा जीव वाल्मिकमध्ये एवढा का गुंतलाय? निवडणुकीत आरोपीची आठवण का काढावी लागतेय?

SCROLL FOR NEXT