corona 
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमध्ये 152 नवे कोरोना बाधित, चौघांचा मृत्यू 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 1 हजार 144 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 992 अहवाल निगेटिव्ह आले असून 152 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

एकाच दिवशी 120 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 35 हजार 482 झाली आहे. आतापर्यंत एक हजार चाळीस जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 754 ऍक्‍टिव्ह कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 32 हजार 688 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत. 

कोरोना चाचणीचे अद्यापही 46 अहवाल प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 11 हजार 973 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 3 हजार 77 जणांना इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन करण्यात आले आहे. आजच्या अहवालामध्ये मृत दाखविण्यात आलेल्या व्यक्तींमधील अकलुज मधील 57 वर्षिय पुरुष, अक्कलकोट तालुक्‍यातील चिंचोली (न.) येथील 40 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील विंचूर येथील 90 वर्षीय पुरुष, माळशिरस तालुक्‍यातील नातेपुते येथील चाळीस वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT