Action on 82 people who went to Morning Walk 
सोलापूर

कोरोना : मॉर्निंग वॉकला गेलेल्या 82 जणांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सांगोला (सोलापूर) : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी देशात संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात 144 कलम लागू असताना सांगोला शहरात मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या 82 जणांवर दोन गुन्हे दाखल करून कारवाई केल्याची माहिती सांगोल्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे. 
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी शासन स्तरावर सर्व विभाग रात्रंदिवस काम करत आहेत. परंतु, काही नागरिक प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत नाहीत. सांगोला शहरातील महूद, चिंचोली, कडलास नाका, वाढेगाव, एखतपूर रस्त्यांवर पेट्रोलिंग करताना अनेकजण कोणतीही दक्षता न घेता, सोशल डिस्टसिंग न ठेवता मॉर्निंग वॉक करत होते. त्या 82 जणांवर सांगोला पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. कोरोना विषाणू वेगाने पसरत असून संसर्ग होऊ याकरिता प्रशासन काळजी घेत आहे. परंतु, काही नागरिकांना गांभीर्य नाही. गांभीर्य नसलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्ष फोडण्याची पुनरावृत्ती झाली तर महाराष्ट्रात राडा होणार; राजीनामा द्या, नाहीतर... ठाकरे गटाचा पत्रकार परिषदेत गंभीर इशारा

Barrier-Free Toll System : टोलनाक्यांजवळील स्थानिक रहिवाशांना दिलासा ! वारंवार टोल भरण्याचा त्रास संपला; सरकार आणतेय स्मार्ट उपाय

Konkan Tourism : आता अथांग समुद्रातून होणार थेट 'कोकण देवदर्शन', 20 ते 50 जणांची क्षमता असणाऱ्या स्पीड बोट्स धावणार; गणपतीपुळे, कुणकेश्वरचा समावेश

Cricket Matches: १६ तास सलग क्रिकेट.... टीम इंडियाच्याच तीन मॅच; जाणून घ्या आजच्या ७ हायव्हाल्टेज सामन्यांचे वेळापत्रक...

पाणी जपून वापरा! विदर्भावर जलसंकटाचं सावट, ११ पैकी ८ जिल्ह्यात परिस्थिती गंभीर, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

SCROLL FOR NEXT